पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर अखेर भारताने ठोस कारवाई
करत पाकिस्तान व पीओकेमधील (पाकव्याप्त काश्मीर) दहशतवादी तळांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हवाई हल्ले केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर अचूक स्ट्राईक करत त्यांचा खात्मा केला.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
या ठोस आणि निर्णायक कारवाईनंतर संपूर्ण देशभरात तसेच राज्यातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक
ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अकोल्यात देखील याचा परिणाम दिसून आला.
अकोल्यातील अग्रेसन चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला.
या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नागरिकांनी “भारत माता की जय”, “पाकिस्तान मुर्दाबाद”,
“जय हिंद, जय सेना” अशा घोषणा देत भारतीय सैन्याच्या धाडसाचे व पराक्रमाचे अभिनंदन केले.
या जल्लोषाद्वारे अकोल्यातील नागरिकांनी दहशतवादाच्या विरोधात
आणि भारतीय सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे निदर्शित केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharitachaya-air-strikentar-chinachi-turkali-pakistanla-restraint/