पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ७ मे रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’
अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत जशास तसे उत्तर दिले.
या निर्णायक कारवाईमुळे फक्त पाकिस्तानच नव्हे, तर त्यांच्या कायमस्वरूपी पाठीराख्या असलेल्या चीनलाही हादरा बसला आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
सध्या परिस्थितीत चीनने पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असं काहीही टाळावं, अशा शब्दांत चीनने आपली भूमिका मवाळ केली आहे.
भारत आणि पाकिस्तानने शांततेने प्रश्न सोडवावा, असेही आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे.
विशेष म्हणजे, भारताच्या हल्ल्यापूर्वी फक्त तीन दिवसांपूर्वीच चीनच्या राजदूतांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांची
भेट घेऊन “बिनशर्त पाठिंबा” जाहीर केला होता. पण भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अवघ्या तीन दिवसांत चीनचा सूर पूर्णपणे बदलला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं, “भारत आणि पाकिस्तान हे आमचे शेजारी आहेत.
आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. दोघांनीही संयम पाळावा आणि शांतता राखावी, हे आमचं मत आहे.”
भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण वाढवली असून, त्यांच्या पाठीशी उभा असलेला एकमेव बलाढ्य देशही
आता सावध पवित्रा घेत आहे. या घडामोडींमुळे भारताने केवळ दहशतवाद्यांवर नाही,
तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही आपलं सामर्थ्य दाखवलं आहे.