इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पाकिस्तानचे खासदार
ताहिर इक्बाल हे संसदेत भाषण करताना अचानक भावनाविवश झाले आणि फूटाफूट रडू लागले.
Related News
मायक्रो मेडिटेशन – काही मिनिटांत तणावमुक्त जीवनाचा मंत्र
मायक्रो मेडिटेशन:आजच्या धकाधकीच्या जगात माणसाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत कामाचा, जबाबदाऱ्यांचा, गो...
Continue reading
Delhi Acid Attack :गुन्ह्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; आरोपी पळून, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू
Delhi : राजधानी Delhi पुन्हा...
Continue reading
Exclusive विठ्ठल महल्ले अकोला : शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे कार्यरत पोलीस अंमलदार गिरीष दशरथ खडके रा. बलोदे लेआउट, हिंगणा रोड या...
Continue reading
बहुचर्चित अक्षय नागलकर हत्या प्रकरणात नवीन चार आरोपींना अटक; आरोपी संख्या आठवर
स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई, चौघांना सात दिवसांची प...
Continue reading
अकोला शहरातील वाशिम बायपासवरील पॉवर हाऊसवर एका 35 वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृताचे नाव ज्ञ...
Continue reading
आरोग्य विमा दावे नाकारले जाण्याची कारणे आणि त्यावर उपाय
आरोग्य विमा आजच्या काळात प्रत्येक घरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रुग्णालयीन
Continue reading
डोनाल्ड ट्रम्पचा दिग्गज प्रशंसा लेख — "असिम मुनीर, शेहबाज शरिफ महान लोक"; पाकिस्तान-अफगाण युद्ध लवकरच सुटवेन — ट्वीक आणि आंतरराष्ट्रीय मागोवा
अमेरि...
Continue reading
Indoreचा कलंक : ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंना त्रास देणारा आरोपी निघाला सिरीयल ऑफेंडर
इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौर शहर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आ...
Continue reading
अकोला शहरात निर्घृण हत्या: अक्षय नागलकर प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक
अकोला, डाबकी रोड पोलीस ठाण्याचे हद्दीत भयावह प्रकरण: हत्या ही घटना अकोला शहर...
Continue reading
मोठा निर्णय! Bangladeshi Illegal Immigrants आता राज्यात आळा बसणार
राज्यात बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार...
Continue reading
लम्पी आजाराचा कहर; आठ गाईंचा मृत्यू, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथे लम्पी आजार...
Continue reading
मूर्तिजापूरमध्ये भव्य अध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचे आयोजन
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगरपालिकेच्या गोयनका नगर परिसरातील गजानन महाराज वाटिका सभागृहामध्ये भव्य अध्यात्मिक बाल
Continue reading
त्यांनी आवाहन केलं – “या खुदा, आज बचा लो… अल्लाह आमच्या देशाची हिफाजत करो.”
भारतानं पहलगाममधील २६ पर्यटकांच्या निर्घृण हत्येनंतर पाकिस्तानमधील दहशतवादी
तळांवर जोरदार कारवाई करत कठोर संदेश दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या तडाख्यामुळे पाकिस्तानच्या लष्करात आणि राजकारणात संभ्रम आणि घबराट निर्माण झाली आहे.
पाकिस्तानकडून मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा अपयशी प्रयत्न
काल रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला.
अमृतसर, जालंधर, लुधियाना, चंदीगड, पठाणकोट, श्रीनगर, आदमपूर आणि फलोदीसह अनेक शहरं लक्ष्य होती.
मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या सर्व मिसाईल्स हवेतच नष्ट केल्या.
भारतीय लष्कराचं प्रत्युत्तर: लाहौरमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त
आज सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या लाहौर शहरामध्ये असलेल्या
हवाई संरक्षण प्रणालींवर अचूक हल्ले करत त्या निष्क्रिय केल्या.
हे प्रतिहल्ले त्याच तीव्रतेने आणि युद्धनैतिकतेनुसार करण्यात आले असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे.
‘परमाणु धमक्या’ थांबल्या; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा पलटलेला सूर
पहलगाम हल्ल्यानंतर सतत भारताला युद्ध आणि परमाणु हल्ल्याच्या धमक्या देणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री
ख्वाजा आसिफ यांचा सूर आता पूर्णतः बदललेला दिसतो. एका परदेशी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की,
“भारत जर माघार घेत असेल, तर आम्हीही तणाव कमी करण्यासाठी तयार आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतोय.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoor-nantar-pakistan-bithleli-kurapat/