जम्मू/श्रीनगर | ८ मे २०२५ – पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आता नियंत्रण रेषेवर
(LoC) अंधाधुंध गोळीबार आणि मोर्टार हल्ले सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानने आता थेट
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
नागरिकांच्या घरांना लक्ष्य करायला सुरुवात केली असून सीमावर्ती अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत.
भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, ७-८ मेच्या रात्री पाकिस्तानच्या चौक्यांनी कुपवाडा, बारामुल्ला,
उरी आणि अखनूर या भागांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता छोट्या शस्त्रांपासून तोफांपर्यंत गोळीबार केला.
भारतीय लष्कराकडूनही योग्य प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
गावांमध्ये धुराचे साम्राज्य, नागरिक जखमी
सीमावर्ती एका गावातील स्थानिकांनी सांगितले की, पहाटे ३ वाजता अचानक गोळीबार सुरु झाला
आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब घराबाहेर पळालं. “आता इथे फक्त धूर आणि उद्ध्वस्त झालेल्या भिंती उरल्या आहेत.
आमची मुलंही जखमी झाली आहेत,” असा हळहळता सूर एका नागरिकाने व्यक्त केला.
पुंछ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
पुंछ जिल्हा हा पाकिस्तानकडून होणाऱ्या संघर्षविराम उल्लंघनाने सर्वाधिक बाधित झालेला असून,
फक्त बुधवारच्या फायरिंगमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून मोर्टार हल्ले सतत सुरू आहेत.
परिणामी, पुंछमधील अनेक गावं रिकामी झाली असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
सरकारकडून सुरक्षित स्थळी स्थलांतराची सुविधा
ज्याठिकाणी सरकारने आधीच सुरक्षित प्लॉट तयार ठेवले होते, तिथे नागरिकांना स्थलांतरित केले जात आहे.
एकाच जागी दोन-तीन कुटुंबं सध्या एकत्र राहत असून, गोळीबार थांबल्यानंतर पुन्हा परतण्याची आशा व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/s-400-sudarshan-chakrachi-kimaya/