लखनऊ | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन
सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोखठोक वक्तव्य करत म्हटलं की,
“ज्यांनी भारताच्या बहिणींचं सिंदूर हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपलं अख्खं खानदान गमावलं.”
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
लखनौमध्ये आयोजित नागरिक सुरक्षा मॉक ड्रिल दरम्यान जनतेला संबोधित करताना योगींनी सांगितलं की,
“देशाच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने काम करायला हवं.”
त्यांनी स्पष्ट केलं की, ऑपरेशन सिंदूर केवळ एक लष्करी कारवाई नाही, तर भारतीय स्त्रीच्या सन्मानासाठी दिलेला
भावनिक आणि निर्णायक संदेश आहे. योगींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करत सांगितलं की,
“ही कारवाई भारताच्या नव्या भूमिकेचं प्रतीक आहे – जो प्रत्येक दुस्साहसाला सडेतोड उत्तर देतो.”
पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता, ज्यात एक नेपाळी नागरिकही होता.
या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पीओके आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
या कारवाईत हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्यासारख्या दहशतवाद्यांचे गड नेस्तनाबूत करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, “देशाच्या सन्मानाशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल.”
त्यांनी भारतीय सैन्य, वायुदल आणि नौदलाचे विशेष आभार मानले आणि सर्व नागरिकांना सतर्क आणि एकजुटीने उभं राहण्याचं आवाहन केलं.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoorwar-sansadelil-all-party-meeting-suru/