राज्याचे राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे. आमचेही
सर्व लोक निवडणुका लढण्यासाठी तयार आहेत. भाजपाची
आमची युती खूप जुनी आहे. पण पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजसाठी
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अलर्ट राहावं. कधीही ब्रेकिंग न्यूज येऊ शकते, असे सूचक विधान
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली बंड केल्यानंतर
शिवसेनेतील अनेक नेते त्यांच्याबरोबर आले. विधानपरिषदेच्या
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह याही काही काळाने शिंदे गटात
सामील झाल्या होत्या. तसेच शिंदेंबरोबर कायम राहिलेले बच्चू कडू
हे आता त्यांची साथ सोडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची
आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी
प्रत्येक पक्ष आपापले मतदारसंघ आणि उमेदवार निश्चिती करत आहे.
उमेदवारही या पक्षातून त्या पक्षात जाण्याची तयारी करत असताना डॉ.
नीलम गोऱ्ह यांनी केलेले एक विधान सध्या चर्चे त आहे. “पत्रकारांनी अलर्ट
राहावे, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल”, असे सूचक विधान त्यांनी केले
आहे. सोलापूर दौऱ्यावर आल्या असताना गोहे म्हणाल्या की, राज्याचे
राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे. आमचेही सर्व लोक निवडणुका
लढण्यासाठी तयार आहेत. भाजपाची आमची युती खूप जुनी आहे. पण
पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजसाठी अलर्ट राहावं. कधीही ब्रेकिंग न्यूज येऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार का?
असा प्रश्न यावेळी गोहे यांना विचारण्यात आला. पण त्यांनी हसून यावर
उत्तर देणे टाळले. त्या म्हणाल्या, “मी असा कोणताही दावा केलेला नाही.
माझ्या तोंडी हे शब्द घालू नका. पण राजकारण बदलत आहे. काही जण
अचानक निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं सांगतात. मग सांगतात
मुलाला उभं करणार. मुलगा काहीतरी वेगळं बोलतो. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
Read also: https://ajinkyabharat.com/mahur-darshanahoon-parattana-bhavikanchya-vehicle-accident/