Eknath Khadse : नातीची छेडछाड, एकनाथ खडसे म्हणाले, इथल्या आकांचं फरार आरोपींना पाठबळ, 3 आरोपी अजून फरार कसे?
Eknath Khadse, Jalgaon : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या छेडखानी प्रकरणात सात पैकी
तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Related News
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
छेडछाड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांना स्थानिक नेत्याचे संरक्षण आहे.
त्याच बरोबर पोलिसांशी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पोलिस त्यांना जाणीवपूर्वक
अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते.
पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत- खडसे
एकनाथ खडसे म्हणाले, छेडछाडीच्या घटनेला 10 दिवस झाले. घटना घडल्यानंतर
आत्तापर्यंत पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेता आलेला नाही. चार जणांना अटक केलेली आहे.
तीन प्रमुख आरोपी आहेत, ते फरार आहेत. ते फरार झालेले नाहीत, इथले जे आका आहेत.
राजकीय व्यक्ती आहेत. त्यांच्या पंखाखाली ते लपलेले आहेत. याच्या पाठिमागे राजकीय शक्तीच आहे.
मी पूर्वी देखील म्हटलं होतं. पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत.
केंद्रीय मंत्री सत्तेत असल्या तरी राज्याचं गृह खात राज्याकडे आहे. याठिकाणी गृहखात्याने पूर्ण प्रयत्न
करुन सुद्धा आरोपी मिळत नाहीत, याचा अर्थ असा की, स्थानिक पोलीस अपयशी आहेत.
सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
पोलीस आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज्यातील चित्र पाहिलं तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं आहे की,
काय असं वाटतंय. पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसत आहे, अशी टीका खडसेंनी केली.
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, निवडणुकीच्या कालखंडात सरकारने अनेक आश्वासनं दिली होती.
लाडक्या बहीणांना 2100 रुपये तातडीने देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र,
आता पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. नुकताच जाहीर झालेला अर्थ संकल्प हा जनतेच्या दृष्टीने हिताचा नाही.
शेतकऱ्यांसाठी यामध्ये कोणतीही तरतूदी नाही. शेतकरी कर्ज माफी आणि लाडकी बहीण योजना या निवडणुकीत
जिंकून येण्यासाठीच्या योजना होत्या. मात्र अर्थ संकल्पात चाळीस हजार रुपयांची तूट आहे. हे जनतेसाठी योग्य नाही.
राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे. अनेकांचे देणे थकलेले आहेत. पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत.
Read more news here : https://ajinkyabharat.com/rangamapachanmichya-divashi-ashi-gya-case-tvchechi-kaji-tagna-kay-sangatatat/