नवी दिल्ली (दि. ६ मे):
देशात ५४ वर्षांनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्यात येत असून,
यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन आहेत.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
बैठकीत सर्व राज्यांचे मुख्य सचिव, सिव्हिल डिफेन्स प्रमुख, तसेच वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सहभागी झाले आहेत.
केंद्र सरकारने ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये ही मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.
या ड्रिलमध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सायरन वाजवून हल्ल्याची सूचना दिली जाईल आणि त्या अनुषंगाने कृती केली जाईल.
रशियाकडून भारताला युद्धनौका, पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच
दरम्यान, पाकिस्तानसोबत तणाव वाढत असतानाच,
भारताला रशियाकडून एक आधुनिक युद्धनौका या महिन्यात मिळणार आहे.
२८ मे रोजी रशिया ही युद्धनौका भारतीय नौसेनेच्या ताब्यात देणार, अशी माहिती आहे.
ही युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज असून ती शत्रूच्या रडारपासून लपून राहू शकते.
पाकिस्तानने ५ आणि ६ मेच्या रात्री नियंत्रण रेषेवर (LoC) आठ ठिकाणी – कुपवाडा,
बारामुला, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर – शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
भारतीय सैन्याने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की,
“भारत कधीही सैनिकी कारवाई करू शकतो. नरेंद्र मोदी हे निवडणुकीसाठी संपूर्ण भागाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवत आहेत.“
पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेला तणाव
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव अधिक वाढला आहे. त्यानंतर भारताकडून आक्रमक पवित्रा घेतला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/union-minister-nitin-gadkari-yancha-akola-aircraft/