जळगाव |
२६ वर्षीय गायत्री कोळीच्या मृत्यूनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक केल्याच्या कारणावरून सासरच्यांनी मारहाण केली
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
आणि अखेर तिचा जीव घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानं प्रकरण खळबळजनक वळणावर पोहोचलं आहे.
जळगाव तालुक्यातील किनोद गावात १ मे रोजी गायत्री ज्ञानेश्वर कोळी या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
मात्र ही आत्महत्या नसून सासू आणि नणंद यांनी मारहाण करून खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
गायत्रीचा मृतदेह पाहून तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
गायत्रीचे वडील आणि आई यांनी स्पष्टपणे सांगितले की, “गायत्री आत्महत्या करूच शकत नाही, तिची सासू आणि नणंद यांनीच गळा दाबून खून केला आहे.”
मासिक पाळीवरून वाद, आणि मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मासिक पाळीमध्येही गायत्रीने स्वयंपाक केल्याने सासू आणि नणंद नाराज होत्या.
त्यावरून वाद झाला, आणि तो इतका विकोपाला गेला की, दोघींनी तिच्यावर बेदम मारहाण केली.
त्यानंतर गळा दाबून खून करून, आत्महत्येचा बनाव तयार करण्यात आला, असा दावा तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
पोलीस तपास सुरु, आरोपी अजूनही मोकाट
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस तपास करत आहेत. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गायत्रीच्या माहेरच्या कुटुंबियांनी सांगितले की, “जबपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.”
राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया
या प्रकारामुळे समाजात मासिक पाळीबद्दलच्या रूढी आणि अंधश्रद्धांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अनेक महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणात जलद कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/2-thousand-rupee-notambabbat-rbi-chi-mothi-declaration/