मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर
यांनी आणलेल्या महाकुंभच्या गंगाजलवर टीका करत गंगा नदीच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला.
त्यानंतर त्यांच्यावर धार्मिक भावना दुखवल्याची टीका होत आहे.
Related News
कुरणखेड जवळ अपघात एक युवक जागेवर ठार.
श्रीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान – सलग 56वे वर्ष, 700 हून अधिक वारकरी सहभागी
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू.
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
मात्र असं असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आज राज ठाकरे यांचं कौतुक केलेलं बघायला मिळालं.
आज माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिमीक्री करत असं बोलायला हिम्मत लागते,
राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली, अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं आहे.
मात्र आम्ही असं बोललो असतो तर आत्तापर्यंत यांच्या घरावर दगड आले असते,
आमच्या विरोधात निषेध मोर्चे निघाले असते, आम्ही देशद्रोही सुद्धा ठरलो असतो, असंही आव्हाडांनी म्हंटलं आहे.
भारतात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मी राज ठाकरे यांचं अभिनंदन
करेल की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिम्मत लागते.
आम्ही बोलायला घाबरतो की आपल्या मागे लागतील हे, पण राज ठाकरे बिनधास्त बोलले आहेत,
असं म्हणत त्याच्या डेरिंगला सलाम आहे, असं म्हणत आव्हाडांनी ठाकरेंना सलाम ठोकला.
Read more news here : https://ajinkyabharat.com/aajchaya-earth-sankalpat-shetkari-debt-forwards-announcement-rohit-pawar/