क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.
यादरम्यान धनश्रीचा एक व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मी आता खूप भावूक झाले आहे, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.डान्सर, कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएन्सर
Related News
नवी दिल्ली | २१ मे २०२५ — पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं राबवलेलं
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं असून, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हवाई आ...
Continue reading
नवी दिल्ली | २० मे २०२५ — केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ वर देशभरातून वाढता विरोध दिसून येत असून,
विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी स...
Continue reading
नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्या...
Continue reading
क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत,
पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
मल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...
Continue reading
बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ
मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा
सिंदू...
Continue reading
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
धनश्री वर्मा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रिकेटर पती युजवेंद्र चहलसोबत तिच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत.
गेल्या काही काळापासून हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचंही म्हटलं जात आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान
धनश्रीला नुकतंच एका चित्रपटाच्या प्रीमिअरला पाहिलं गेलं. अभिनेता अभिषेक बच्चनच्या ‘बी हॅपी’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला ती पोहोचली होती.
यावेळी तिने पापाराझींसोबत गप्पासुद्धा मारल्या. या गप्पांदरम्यान धनश्रीने सांगितलं की ती अत्यंत भावूक झाली आहे.
अभिषेक बच्चनच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. “मी फार भावूक झाले आहे आता. हा चित्रपट खूपच चांगला आहे”,
असं ती म्हणाली. ‘बी हॅपी’ या चित्रपटाची कथा बापलेकाच्या नात्यावर आधारित आहे.
या चित्रपटाची कथा खूपच भावूक असल्याचं धनश्रीने म्हटलंय.
धनश्रीच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करण्यास सुरुवात केली.
धनश्रीच्या प्रतिक्रियेचा संदर्भ काहींनी युजवेंद्रच्या घटस्फोटाशी लावला.
‘जेव्हा चहलपासून विभक्त झाली, तेव्हा भावूक झाली नव्हती का’, असा सवाल एका नेटकऱ्याने केला.
तर ‘चहलकडून 60 कोटी रुपयांची पोटगी घेऊन आता भावूक झाली आहे’, असा टोला दुसऱ्या युजरने लगावला आहे.
युजवेंद्र चहलसोबत धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अशी अफवा होती की तिने 60 कोटी रुपये पोटगीची मागणी केली.
मात्र या अफवा खोट्या असल्याचं धनश्रीच्या कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
“पोटगीबाबत पसरवल्या जाणाऱ्या तथ्यहीन वृत्तांबद्दल आम्हाला खूप राग आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की
धनश्रीकडून अशी कोणतीही रक्कम मागितली गेली नाही. या चर्चांमध्ये काहीच सत्य नाही”, असं त्यांनी म्हटलं होतं.
धनश्री आणि युजवेंद्र यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती
धनश्रीच्या वकिलांनी दिली. त्याचप्रमाणे घटस्फोटाबाबत कोणतंही वृत्त जाहीर करण्यासाठी तथ्य तपासून पाहण्याची विनंती
तिच्या वकिलांनी केली. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार कोर्टातील
सुनावणीदरम्यान धनश्री आणि युजवेंद्रने स्पष्ट केलंय की ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे राहत आहेत.
Read more news here: https://ajinkyabharat.com/vidarbhas-kadaka-akol-is-a-temperature-of-713-akshanwar/