भुवनेश्वर: लोकसभा निवडणूक सुरु असताना ओदिशामध्ये बीजू जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपकडून बीजदला फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर बीजदमध्ये सगळेच काही गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत, असं विधान भाजपचे नेते समीर मोहंती यांनी केलं. यानंतर बीजदच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘बीजू जनता दलामध्ये सगळेच काही गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत,’ असं विधान भाजप नेते समीर मोहंती यांनी केलं. बीजदचे नेते व्ही. के. पांडियन यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. ‘बीजदमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. भाजपनं विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० जागा जिंकल्यास त्यांच्याकडून राज्यातलं बीजद सरकार पाडण्यात येईल,’ असा खळबळजनक दावा पांडियन यांनी केला.
पांडियन यांच्या आरोपांना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष समीर मोहंती यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘मुख्यमंत्र्यांचे हाऊस मॅनेजर सेफॉलॉजिस्ट कधीपासून झाले? पांडियन मुख्यमंत्र्यांचे रिमोट कंट्रोल आहेत का?’ असे सवाल मोहंतींनी उपस्थित केले. ‘आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप ५० जागा जिंकणार असल्याचं पांडियन खात्रीपूर्वक सांगत आहेत. मग ४ जूनला काय होणार हेदेखील त्यांना माहीत असेल,’ असा टोला मोहंती यांनी लगावला.
Related News
अंबरनाथ नगरपरिषदेच्या सभेत शिंदे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी 'थोडा भ्रष्टाचार झालाच पाहिजे' असे वादग्रस्त...
Continue reading
Parliament Monsoon Session २० जुलै ते १३ ऑगस्ट २०२६ दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पक्षफुटी, १३१वे घटनादुरुस्ती विधेय...
Continue reading
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी पा...
Continue reading
पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ! अमित शहांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; काँग्रेस फुटणार की केवळ राजकीय योगायोग?
पंजाबच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील का...
Continue reading
PM मोदींचा भार कमी होणार? अमित शाह उपपंतप्रधानपदी विराजमान होणार? मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग; 7 मोठे संकेत
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मं...
Continue reading
मुनगंटीवार म्हणाले- ‘जिल्ह्याचं कल्याण त्यांनीच ठरवलंय’ : राज्यातील सत्ताधारी भाजपमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र सातत्याने मांडले जात असले, तरी चंद्रपूर जिल्ह्यातील अंतर्गत ...
Continue reading
नितीन गडकरींना 'सुपर' जबाबदारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे....
Continue reading
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपविरोधात मोठा एल्गार पुकारला आहे. अयोध्या येथ...
Continue reading
राघव चड्ढा यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दणका; 52 पोस्ट हटवण्याची मागणी फेटाळली, 'राजकीय व्यंग हा लोकशाहीचा भाग'
दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभा खासदार
Continue reading
राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या मुद्यावर संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला; 'रावणानेही कधी दानपेटी लुटली नाही', कायदा-सुव्यवस्थेवरही गंभीर सवाल
मुंबई : ...
Continue reading
‘बीजदमध्ये सगळेच गुलाम नाहीत. त्यांच्या पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत. ते आमच्या सतत संपर्कात आहेत. आपल्या पायाखालची जमीन सरकतेय याची बीजदला कल्पना आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष याआधीच या एकनाथ शिंदेंबद्दल बोलले आहेत. त्यात नवीन काहीच नाही,’ असं मोहंती म्हणाले. ओदिशा अस्मितेची जाणीव असलेले नेते जास्त काळ गुलाम म्हणून राहू शकणार नाहीत, असंही त्यांनी पुढे म्हटलं.