महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा थेट परिणाम आता जनतेच्या खिशावर दिसून येतोय.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, फरसबी, गवार, मटार यांसारख्या भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
यामुळे रोजच्या जेवणाचा खर्च वाढला असून गृहिणींच्या बजेटचा समतोल बिघडला आहे.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
फरसबी, गवार, तोडली, शिमला मिरची यांसारख्या भाज्यांचे दर सध्या १६० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत.
इतकेच नव्हे तर पापडी १२० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो आणि बीट ६० रुपये किलो मिळत आहे.
लिंबूंनीही महागाईची चव घेतली असून ३ नग २० रुपयांना मिळत आहेत.
महागाईचा हा तडका केवळ स्वयंपाकघरापुरताच मर्यादित नाही. गोकुळ दूध दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ झाली आहे
. यामुळे मुंबई-पुण्यात म्हशीचे दूध ७४ रुपये आणि गायीचे दूध ५८ रुपये लिटरला विकले जात आहे.
राज्यातील इतर भागात हे दर थोडेसे कमी असले तरी महागाईचा परिणाम सर्वदूर जाणवतो आहे.
दरम्यान, मुंबईत प्रवास करणाऱ्यांनाही बेस्टच्या बस दरवाढीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
तिकीट दर दुप्पट झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार आला आहे.
महागाईने सर्वसामान्यांच्या जीवनात अस्वस्थता निर्माण केली असून, पुढील काळात अजून किती दर वाढतील,
याची चिंता आता जनतेला सतावत आहे. शासनाने या महागाईवर काही उपाय योजना करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
READ MORE HEREhttps://ajinkyabharat.com/anti-national-bollam-tar-bye-pakistani-artist-india/