ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
ज्या कुटुंबाचंं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती.
Related News
माजी लिबियन हुकूमशहाचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफी ठार झाल्याचा दावा
लिबियाच्या राजकारणात खळबळ, मृत्यूबाबत परस्परविरोधी माहिती
Continue reading
दिवसा होणार काळाकुट्ट अंधार! 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाची उत्सुकता शिगेला, कालावधी आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
2026 हे वर्ष खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत...
Continue reading
EPFO Pension Rules : 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार? जाणून घ्या सविस्तर गणित
EPFO पेन्शनवर मोठा दिल...
Continue reading
Budget 2026 : आठवा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होणार की नाही? अर्थसंकल्पातून काय मिळाले संकेत?
केंद्र सरक...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला गती; छगन भुजबळांचे विधान चर्चेत
महाराष्ट्रातील राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर ...
Continue reading
घड्याळात ‘11.11’ वाजले की खऱ्या मनापासून इच्छा मागा, परंतु हे खरंच पूर्ण होते का?
आपल्या दैनंदिन आयुष्यात असे अनेक छोटे-छोटे संकेत येतात जे आपल्याला अचंबित करतात. त्यापैकी एक लोकप...
Continue reading
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 : तात्काळ दिलासा ते भविष्यातील योजनांचा धोरणात्मक सेतू
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा बदल; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पक्षातील निर्णयांमध्ये नवा अध्याय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतेच एका दुःखद घडामोडीचा सामना ...
Continue reading
मुंबईचा महापौर ठरला! 11 फेब्रुवारीला मतदान – राजकारणामागील मोठ्या हालचाली
मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीच...
Continue reading
ICC बोर्ड मीटिंग: पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना नाकारला, वर्ल्डकपमधून बाहेर काढण्याचा धोका?
48 तासांत ICC चे निर्णय: 7 फेब्रुवा...
Continue reading
घरच्या घरी बनवा परफेक्ट महाराष्ट्रीयन थेचाः ६ सोपे आणि प्रभावी टिप्स
महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरात एक छोटा पण अत्यंत स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्यामुळे जेवणात तात्काळ तिखटपणा आणि चव ये...
Continue reading
2026 Grammy Awards : केंड्रिक लॅमार आणि बॅड बनी यांना सर्वोच्च सन्मान
दिवसाअखेरीस संगीतविश्वातील सर्वात प्रतिष्ठित आणि मोठ्या प्रमाणावर चर्चिले जाणारे
Continue reading
आतापर्यंत एकूण नऊ हाफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे.
तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे.
मात्र दुसरीकडे काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहील असा दावा महायुतीच्या सरकारकडून केला जात आहे.
दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 हजार रुपये नाही तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता.
मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
याबाबत बोलताना सर्व सोंगं करता येतात परंतु पैशांचं सोंग करता येत नाही.
राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्यवेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली, त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 देणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
विरोधकांनी सुधरावं, आम्ही जे बोललो ते बोललो, काँग्रेसने देखील आश्वासन दिली होती, मात्र त्यांनी ती पाळली नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मात्र तरी देखील 2100 रुपये कधी मिळणार? याकडे आता राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.