IND vs NZ : भारतीय क्रिकेट टीमने आधीच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये दमदार प्रदर्शन करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
टीम इंडियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे.
या मॅचआधी टीम इंडियाला थोडी धाकधूक असताना केएल राहुलने आता एक चांगली बातमी दिली आहे.
Related News
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
वेस्टर्न कोल लिमिटेड अर्थातच WCL मध्ये नोकरी लाऊन देण्याचा आमिष दाखवून अकोल्यातील 25 बेरोजगार युवक
युवतींची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहेय.
विशेष म्हणजे नोकरी न मिळाल्य...
Continue reading
मुंबईतील हिंदी भाषिकांवरील मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले ...
Continue reading
अकोट
अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ व श्री.संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी जळगाव नहाटे
या संस्थांची हमी भावा अंतर्गत शासकिय ज्वारी खरेदी करण्यासाठी सब ...
Continue reading
टाकळी बु
विनोद वसु
शेतकरी सुखी तर देश सुखी शेतकरी देशाचा पोशिंदा असे एकेकाळी म्हटल्या जात होते. परंतु शेतकऱ्यांना शेती
करणे आता अवघड झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील सस्ती खेट्री पिंपळखुटा शिरपूर चतारी सायवणी चान्नी सावरगाव उमरा पांगरा सुकळी चांगेफळ आदीसह
तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांचे र...
Continue reading
पंढरपूर दिनांक सहा वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या आषाढी महापर्वता
निमित्य 15 लाखांवर विठ्ठल भक्त टाळ मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत
शनिवारी पंढरीस दाखल झाले इस...
Continue reading
"युतीवर भाष्य नको, आधी माझी परवानगी घ्या" – राज ठाकरे
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान,
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना...
Continue reading
काल दिनांक 05/07/2025 रोजी
गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी
ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात
असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षकांनी पकडून
आरोपींवर एमआयड...
Continue reading
टीम इंडियाचे फॅन्स सध्या आनंदात आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया दमदार प्रदर्शन करत आहे.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवाच दु:ख त्यामुळे थोडं कमी झालं आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय फॅन्सना आता आणखी एक चांगली बातमी मिळालीय. केएल राहुने ही बातमी दिलीय.
विकेटकिपिंगची जबाबदारी संभाळणाऱ्या केएल राहुलने सांगितलं की,
“साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा
आणि स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फिट आहे”
दुबईमध्ये रविवारी 2 मार्चला टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए मधील हा शेवटचा सामना आहे.
भारत आणि न्यूझीलंड दोन्ही टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत.
पण या सामन्याचा निकाल ठरवेल की, कोणती टीम पहिला सेमीफायनलचा सामना खेळणार.
हा सामना फक्त औपचारिकता मात्र नाहीय. महत्त्वाची मॅच आहे ही.
टीम इंडियाला पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावं लागणार आहे.
त्या बाबतीत टीम इंडिया कुठलाही धोका पत्करणार नाही
रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे दोन्ही दिग्गज पूर्णपणे फिट आहेत.
त्यामुळे मॅचच्या एकदिवस आधी टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी 28 फेब्रुवारीला टीम इंडियाने पत्रकार परिषद बोलावलेली.
त्यात केएल राहुलने दोघांच्या फिटनेसच्या प्रश्नावर हे उत्तर दिलं. “रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल
कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही.
दोघेही शेवटच्या सामन्यासाठी उपलब्ध आहेत” असं केएल राहुल म्हणाला.
दोन्ही दिग्गजांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होईल का? किंवा सेमीफायनलचा विचार
करुन आराम देण्यात येईल तो खुलासा राहुलने केला नाही.
रोहित आणि शमीच्या बाबतीत टीम इंडिया कुठलाही धोका पत्करणार नाही.
त्यांना आराम देऊ शकते अशी शक्यता आहे.
काय त्रास झालेला?
पाकिस्तान विरुद्ध 23 फेब्रुवारीला झालेल्या सामन्याच्यावेळी रोहितला
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय कर्णधार बराचवेळ
मैदानाबाहेर होता. त्यावेळी उपकर्णधार शुभमन गिलने जबाबदारी संभाळली होती.
रोहितनंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, तरीही त्याच्या फिटनेसबद्दल संशय कायम आहे.
दुसऱ्याबाजूला स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सुद्धा फिटनेस समस्येचा सामना करावा लागला.
त्याला गुडघ्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे सुरुवातीच्या 3-4 ओव्हरनंतर तो बराचवेळ मैदानाबाहेर होता.
त्यानंतर त्याने मैदानावर येऊन आपला स्पेल पूर्ण केला. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट काढल्या होत्या.
Read more news here : https://ajinkyabharat.com/hi-ray-summer-mumbai/