पुंडा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, पुंडा यांच्या वतीने संचालित श्री नंदिकेश्वर विद्यालयात आज इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप समारंभ देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. इयत्ता नववीतील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी घुगे हिने सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली. मंचा वर उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक राहुल मानकर सर तसेच शिक्षिका सुनंदा देवळे यांना दीपप्रज्वलनासाठी आमंत्रित करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमास औपचारिक प्रारंभ झाला.
या प्रसंगी प्रा. संतोष पुंडकर , अनिल बिहाडे , प्रमोद पुंडकर, प्रकाश चव्हाण , किरण आठवले , रोशनी कुलट तसेच शिक्षकेतर कर्मचारी दुर्योधन वानखडे आणि विकी अढाऊ उपस्थित होते.
Related News
ITI Admission 2026: दुसऱ्या फेरीला वेग, 'इलेक्ट्रिशियन'सह 10 ट्रेड्सना प्रचंड मागणी; 21 जुलैला तिसरी यादी
छत्रपती संभाजीनगर: राज्यातील औद्योगिक ...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,090 जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी तब्बल 20,931 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश पंधरवडा, शिक्षकांच्...
Continue reading
अकोला शहरातील खदान परिसरातील ख्रिश्चन कॉलनी येथे असलेल्या सानिया उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी (25 जून) सकाळी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस ...
Continue reading
Maharashtra FYJC Admission 2026: 6.8 लाख विद्यार्थ्यांना मोठा धक्का! कॅप फेरी-2 अचानक स्थगित; जाणून घ्या 7 महत्त्वाची अपडेट्स
महाराष्ट्रातील अकरावी ऑनलाइ...
Continue reading
पुण्यात भीषण अपघात! जनगणनेच्या कामावर निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू; प्रशासनासह शिक्षण क्षेत्रात हळहळ
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात बुधवारी सका...
Continue reading
MHT-CET Controversy: इंजिनिअरिंग प्रवेशाच्या मेरिट लिस्टवर मोठा वाद, CET सेलचा खुलासा
महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेतील सर्वा...
Continue reading
राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून (NTA) आयोजित करण्यात आलेली NEET UG 2026 परीक्षा आज देशभरात अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडत आहे. देशातील लाखो विद्य...
Continue reading
कल्याण : कल्याण पूर्वेतील कमलादेवी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक व मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या आरोपांवरून वातावरण चांगलेच तापले आ...
Continue reading
Solapur SSC Student Courage : वडिलांच्या निधनाच्या दुःखावर मात करत सोलापूरमधील विद्यार्थिनीने दहावीची परीक्षा दिली. जाणून घ्या सं...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी : एकात्मिक समाज शिक्षण प्रसारक मंडळ गांधीग्राम द्वारा संचालित श्री शंकर विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शनिवार, दि. १४ फेब्रुवारी ...
Continue reading
कार्यक्रमादरम्यान इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करत विविध करिअर संधींबाबत माहिती दिली तसेच आगामी दहावीच्या परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून आभार प्रदर्शन करण्यात आले. तसेच नववीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. विद्यार्थी व शिक्षकांनी आनंदाने आणि उत्साहाने स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
अशा प्रकारे अत्यंत आनंददायी, उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात निरोप समारंभ यशस्वीरीत्या संपन्न झाला.
read also : https://ajinkyabharat.com/crisis-on-indian-farmers-due-to-india-us-trade-agreement-intense-concern-of-shetkari-vikas-mancha/