मे महिना संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असतानाही मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावातील नाल्यांचे उपसण अद्याप झालेले नाही.
परिणामी ठिकठिकाणी नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असून,
त्यामध्ये दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
मुख्य रस्त्यांवरून घाण पाणी वाहत असल्यामुळे गावातील लहान मुले, वृद्ध, महिलांना रोजच्या हालचालींसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शाळा,अंगणवाडी, देवस्थान परिसरातसुद्धा हीच अवस्था दिसून येते.
ग्रामस्थांनी अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी रोज या रस्त्यांवरून ये-जा करतात, पण त्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.
“निवडणुकीच्या काळात आश्वासनांची भरमसाठ वचने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर
मात्र गावकऱ्यांच्या समस्या ऐकण्यास तयार नसतात,” असा आरोप ग्रामस्थांकडून होतो आहे.
गाव विकासासाठी कोणतेही ठोस नियोजन किंवा कृती होताना दिसत नाही.
विकासाची मोठी स्वप्ने दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गावातील मूळ गरजा – नालेसफाई, स्वच्छ पाणी, रस्ते आणि सार्वजनिक दिवाबत्ती – या
प्राथमिक बाबींवर देखील काम होत नसल्याने, ग्रामस्थांच्या संतापाला उधाण आले आहे.
“गावाला स्मार्ट बनवण्याची क्षमता आपल्यात नाही , पण कमीत कमी मुलभूत गरजा तरी पूर्ण करा,” अशी माफक अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-daambi-gavat-acute-panitancha-citizen-zp-ceo-office/