मे महिना संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असतानाही मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावातील नाल्यांचे उपसण अद्याप झालेले नाही.
परिणामी ठिकठिकाणी नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असून,
त्यामध्ये दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
Related News
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
कीर स्टार्मर यांचा राजीनामा : युरोपमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदासह लेब...
Continue reading
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उलट त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र संयुक्त राष्ट्राच्या मं...
Continue reading
दुबईहून परतलेल्या भारतीय तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईची स्वच्छता, शिस्त, ट्रॅफिक नियम, एमिराती कार्ड आणि भारताशी केलेल्या तुलनेमुळ...
Continue reading
मुकेश खन्नांचा मोठा यू-टर्न? समय रैनासोबत जाहिरातीनंतर 7 कारणांनी नेटकऱ्यांचा संताप उसळला
गेल्या काही महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात असलेला स्...
Continue reading
स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे सुरू असलेल्या अमेरिका-इराणमधील महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी क...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
मुख्य रस्त्यांवरून घाण पाणी वाहत असल्यामुळे गावातील लहान मुले, वृद्ध, महिलांना रोजच्या हालचालींसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शाळा,अंगणवाडी, देवस्थान परिसरातसुद्धा हीच अवस्था दिसून येते.
ग्रामस्थांनी अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी रोज या रस्त्यांवरून ये-जा करतात, पण त्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.
“निवडणुकीच्या काळात आश्वासनांची भरमसाठ वचने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर
मात्र गावकऱ्यांच्या समस्या ऐकण्यास तयार नसतात,” असा आरोप ग्रामस्थांकडून होतो आहे.
गाव विकासासाठी कोणतेही ठोस नियोजन किंवा कृती होताना दिसत नाही.
विकासाची मोठी स्वप्ने दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गावातील मूळ गरजा – नालेसफाई, स्वच्छ पाणी, रस्ते आणि सार्वजनिक दिवाबत्ती – या
प्राथमिक बाबींवर देखील काम होत नसल्याने, ग्रामस्थांच्या संतापाला उधाण आले आहे.
“गावाला स्मार्ट बनवण्याची क्षमता आपल्यात नाही , पण कमीत कमी मुलभूत गरजा तरी पूर्ण करा,” अशी माफक अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-daambi-gavat-acute-panitancha-citizen-zp-ceo-office/