शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक निर्णयांचा पाऊस, अजितदादांच्या तीन मागण्यांना मंजुरी
शेतकऱ्यांसाठी खुशखबर: राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकरी, पायाभूत सुविधा, उद्योग, जलसंपदा आणि प्रशासकीय पातळीवर दूरगामी परिणाम करणारे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज (10 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक ठरली. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची सविस्तर माहिती दिली.
या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूमी अधिग्रहणाला दिलेली मान्यता. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधी उभारणीसही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या सुमारे 96 टक्के शेतकऱ्यांनी स्वेच्छेने जमीन देण्यास संमती दर्शवली आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून पुणे आणि परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
तिसऱ्या मुंबईच्या दृष्टीनेही मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अटल सेतूच्या जवळ एमएमआरडीएला देण्यात आलेल्या जागेवर सिडको आणि एमआयडीसीचे नियम लागू करून भूमी अधिग्रहण करता येईल, यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे ‘तिसरी मुंबई’ संकल्पनेला गती मिळणार असून औद्योगिक आणि नागरी विकासासाठी नवे दालन खुले होणार आहे.
Related News
भारताचा 1 मोठा निर्णय; नेपाळमध्ये खळबळ, बालेन शाह सरकार अडचणीत
-
By
Vivek Raut
उन्हाळ्यातील कूलिंग डिनर! ‘Raw Mango Rice’ ठरतोय आंबाप्रेमींची पहिली पसंती
पंतप्रधान आवास योजनेत मोठी झेप! पुढील वर्षी 15 लाख घरांचे वितरण
-
By
Vivek Raut
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात कांदा खरेदीला आजपासून सुरुवात
-
By
Vivek Raut
600 कोटींच्या ब्लॉकबस्टरच्या सिक्वेलवर शोककळा! ‘जेलर 2’ सेटवर मोठी दुर्घटना
-
By
Vivek Raut
मोठी खुशखबर! 33 हजारांहून अधिक ग्राहक झाले वीज निर्माते, मिळाले 78 हजारांचे अनुदान
-
By
Vivek Raut
शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणारा निर्णय जलसंपदा विभागाशी संबंधित आहे. राज्यातील 40 प्रकल्प आणि 100 कालवे पूर्ण करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे प्रकल्प पुढील एक ते दोन वर्षांत पूर्ण होणार असून यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी सुधारणा होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेल्या तीन महत्त्वाच्या मागण्यांनाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामध्ये बारामती येथे 75 कोटी रुपयांचे भव्य क्रीडा संकुल उभारणे, वालचंदनगर–रत्नापूर एमआयडीसीसाठी 1000 एकर जागा उपलब्ध करून देणे, तसेच राज्यात 11 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा समावेश आहे. या निर्णयांमुळे बारामती आणि परिसरातील विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
याशिवाय, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ परिसरात दिवंगत अजितदादा पवार यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विधिमंडळ परिसरात त्यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे.
एकूणच, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय राज्याच्या विकासाला गती देणारे, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करणारे ठरले आहेत. आगामी काळात या निर्णयांचे प्रत्यक्ष परिणाम राज्यातील नागरिकांना अनुभवता येणार आहेत.