प्रतिनिधी : देवानंद खिरकर
अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५ मध्ये ई-पीक पाहणी न केलेल्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामस्तरीय प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, या संधीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज सादर करावा.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णय क्रमांक लवेसू–२०२५/शिकन/प्र.क्र.३/भूमापन, दिनांक १४ डिसेंबर २०२५ आणि जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांच्या पत्र दिनांक १६ डिसेंबर २०२५ नुसार, ई-पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व गावांमध्ये ही कार्यवाही कालबद्ध पद्धतीने राबविली जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे ई-पीक पाहणी करता आली नाही, त्यांनी दिनांक १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज सादर करावा. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्तरीय समितीमार्फत दिनांक २५ डिसेंबर २०२५ ते ०७ जानेवारी २०२६ या कालावधीत शेतभेट, स्थळपाहणी व पंचनामे केले जातील.
Related News
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; करपलेल्या पिकांचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण, नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा
Maharashtra Farmer News...
Continue reading
जनधन योजनेबाबत धक्कादायक माहिती; 5.72 कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक
प्रत्येक चौथ्या जनधन खात्यापैकी एक खाते निष्क्रिय; आरटीआयमधून समोर आली आकडेवारी, महाराष्ट्रातील 36.04 लाख खात्...
Continue reading
Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; केंद्राच्या १० लाख टन आयात निर्णयासमोर नवा पेच
देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आता केंद्र सरकारच्या साखर आय...
Continue reading
EPFO सदस्याच्या मृत्यूनंतर PF-पेन्शन कसं मिळतं? जाणून घ्या संपूर्ण क्लेम प्रक्रिया; कुटुंबाला PF सोबत विम्याचाही लाभ
EPFO PF and Pension...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
Eggs Price Hike : साखरेनंतर आता अंड्याच्या दरवाढीचा फटका; इथेनॉलसाठी मक्याचा वाढता वापर ठरणार कारण?
साखरेच्या वाढत्या दरामुळे आधीच सामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर ताण आला असतान...
Continue reading
शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो; मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना AI आणि तंत्रज्ञानाच्या वापराचा सल्ला
शेती क्षेत्रासमोरील वाढता ...
Continue reading
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं मानधन १५०० वरून ३ हजार करण्याची मागणी; आमदार रवी राणांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फॉर्म्युला
मुख्यमंत्री माझी
Continue reading
FD पेक्षा जास्त परतावा? RBI ची फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड योजना कशी काम करते; जाणून घ्या संपूर्ण माहिती
बचत आणि गुंतवणुकीसाठी सध्या बाजारात अनेक पर्याय...
Continue reading
शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळ...
Continue reading
सरकारचा मोठा निर्णय! गव्हाचे पीठ, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली; चार वर्षांनंतर काय घडलं?
केंद्र सरकारने गव्हाचे पीठ, मैदा, रवा आ...
Continue reading
Sugar Price Hike : साखरेचा भाव गगनाला भिडला; शेतकऱ्यांनाही होणार फायदा, कृषीमंत्री भरणेंनी सांगितलं कारण
Sugar : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या बज...
Continue reading
स्थळपाहणी नंतर अहवाल गावनिहाय एकत्रित स्वरूपात आवश्यक कागदपत्रांसह दिनांक ०८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित कार्यालयास सादर केला जाईल. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही संपूर्ण प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करणे अनिवार्य असून कोणत्याही प्रकारची दिरंगाई झाल्यास ग्रामस्तरीय समिती जबाबदार राहील.
अकोट तहसीलदारांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ही सुवर्णसंधी गमावू नका आणि वेळेत अर्ज सादर करून आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करावी. या संधीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळतील आणि पिकांचे सरकारी नोंदणीत समावेश सुनिश्चित होईल.
या निर्णयामुळे ई-पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांची नोंदणी करण्याची अंतिम संधी मिळाली आहे. ग्रामस्तरावर कार्यवाही निश्चित वेळेत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांनी तात्काळ आवश्यक अर्ज करणे अत्यंत गरजेचे आहे.
read also : https://ajinkyabharat.com/keep-the-akot-akola-timings-as-before-otherwise-the-railway-will-be-closed/