अकोला – अकोला जिल्ह्यातील कासमपूर पळसो गावात काही दिवसांपूर्वी एका
रुग्णामध्ये कॉलराची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो कासमपूरच्या वैद्यकीय पथकाने तत्काळ
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
कारवाई करत गावात व्यापक आरोग्य तपासणी व सर्वेक्षण मोहीम राबवली आहे.
गावातील २८६ घरांमध्ये सुमारे १,२०६ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून,
त्यामध्ये एका व्यक्तीमध्ये कॉलराची पुष्टी झाली आहे.
त्याचबरोबर इतर तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या
प्रमुख डॉ. रूपाली पवार व त्यांच्या पथकाने गावातील १,०८६ घरांचे सर्वेक्षण करून तब्बल ४,९९२ ग्रामस्थांची तपासणी केली.
सुदैवाने या तपासणीत कोणताही नवीन कॉलराचा रुग्ण आढळून आलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.
गावात शुद्ध पाणी पुरवठा व जनजागृती मोहीम सुरू
कॉलराचा संसर्ग पाण्याद्वारे पसरतो, याची जाणीव ठेवून गावात वैद्यकीय दृष्ट्या शुद्ध केलेले
पाणी वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
तसेच, स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
डॉक्टरांकडून दिलासा
डॉ. पवार यांनी सांगितले की, “उपचार सुरू असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे आणि
गावात नवीन कोणताही कॉलराचा रुग्ण आढळलेला नाही.
सध्या गावात कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा धोका नाही.“
ग्रामस्थ अजय प्रधान यांनी आरोग्य विभागाच्या तत्परतेचे कौतुक करत सांगितले,
“आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळेवर आणि योग्य ती काळजी घेतल्यामुळे कॉलराचा फैलाव थांबवता आला आहे.“