बार्शी टाकळी तालुक्यातील राजनखेड येथील आदर्श ग्रामपंचायत अधिकारी मनोज देविदास गवई यांचा पंचायत समिती बार्शी टाकळी येथील वसंतराव नाईक सभागृहात शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गवई यांनी ग्रामसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत बार्शी टाकळी तालुक्याचे व अकोला जिल्ह्याचे मान उंचावले आहे. त्यांनी सन 2017 मध्ये राजनखेड गावात रुजू होऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात हागणदारी मुक्ती साधली, कोविड-19 काळात लसीकरण व जनजागृती करून नागरिकांचे आरोग्य सुधारले आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हा व विभागस्तरीय पुरस्कार मिळवून गावाला मोठे पारितोषिक मिळवून दिले.
अलीकडेच ‘माझी वसुंधरा 5.0’ अंतर्गत अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळवून रु. 50 लाखांचे पारितोषिक राजनखेड ग्रामपंचायतला मिळवून देणे ही त्यांच्या कार्याची नवीन उंची ठरली. या यशामुळे बार्शी टाकळी तालुक्याची प्रतिष्ठा राज्यस्तरावर वाढली असून विविध स्तरांवर त्यांचे कौतुक होत आहे.
सत्कार कार्यक्रमास गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जि. प. अकोला रविकांतजी पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनीता इंगळे, प्रशासन अधिकारी दिलीप शिरसाट, विस्तार अधिकारी (पंचायत) दीपक इंगळे, संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बोचरे, तालुकाध्यक्ष नारायणजी दिवनाले, सचिव राजेश बंड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तांबडे आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
Related News
Cabinet Decisions : ग्रामपंचायतीपासून अनुसूचित जातीपर्यंत… महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय; कॅबिनेट बैठकीत नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र...
Continue reading
मोर्णा नदीवरील पुलाची उंची वाढवा; १७ ते १८ गावांचा प्रश्न ऐरणीवर – ग्रामस्थांचा तीव्र इशारा
अकोला व अमरावती जिल्ह्यांना जोडणाऱ्या अदुरा–गांधीग्राम मार्गावरील
Continue reading
पातुर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक सचिव सुरेश काकाणी यांनी गुरु...
Continue reading
अकोट : तालुक्यातील बोर्डी, शिवपूर, रामापूर परिसरात मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला वेग आला आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणा...
Continue reading
अकोल्यात आयजीपी महेश पाटील यांचा दमदार दौरा! गुन्हेगारी नियंत्रणासाठी दिले महत्त्वाचे निर्देश
अमरावती विभागाचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजीपी)
Continue reading
बेलखेड गावाजवळ शिरलेल्या अस्वलामुळे खळबळ; वन विभागाच्या थरारक मोहिमेनंतर अखेर जेरबंद
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावाजवळील शेत पर...
Continue reading
पालघरमध्ये 1 चिमुकलीच्या भाषणाने सचिन तेंडुलकर भारावला – प्रेरणादायी घटना ठरली चर्चेचा विषय
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गुहीर गावा...
Continue reading
आंध्र प्रदेशात धार्मिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री N. Chandr...
Continue reading
राज्य मंत्रिमंडळाचे 7 मोठे निर्णय जाहीर; नोकरभरती सुधारणा ते 6 जिल्ह्यांना ‘आकांक्षित जिल्हा’ दर्जा
राज्य मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री देव...
Continue reading
कार्यक्रमाचे अध्यक्ष रविकांतजी पवार यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांनीमनोज गवई यांचा आदर्श घेत काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष नारायणजी देवाने केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी तांबडे यांनी केले.
read also : https://ajinkyabharat.com/important-information-for-punyatil-domestic-gas-customers-customers-who-do-not-do-kyc-will-not-get-the-cylinder/