बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर काटेपुर्णा बसथांब्याजवळ मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास ट्रॅक्टर आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजूकडून मुर्तिजापूरकडे एमएच ३० बीवाय ९१३२ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून एक युवक जात होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने काटेपुर्णाकडून बोरगाव मंजूकडे येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत अचानक समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच ‘वीर भगतसिंग पथका’चे प्रमुख योगेश विजयकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी युवकाला रुग्णवाहिकेच्या मदतीने त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Related News
पालघरमध्ये भीषण अपघात: लग्नसोहळ्याचा आनंद क्षणात दुःखात बदलला
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील धानीवरी परिसरात मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रवि...
Continue reading
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात 24 वर्षीय चंद्रहार शिंदे या हुशार तरुणाने भररस्त्यात झालेल्या कथित अपमानानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्का...
Continue reading
Eknath Shinde CM News : बच्चू कडूंच्या वक्तव्याने पुन्हा रंगली मुख्यमंत्रीपदाची चर्चा, शेतकरी आंदोलन ते मराठा आरक्षणावरही स्पष्ट भूमिका
...
Continue reading
मी जात-पात धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न झाला; धनंजय मुंडेंची खदखद अखेर बाहेर
परळीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात माजी मंत्री आणि आमदार
Continue reading
Kalyan Crime News : मुलांना चोरीचं प्रशिक्षण देणारे बाप अटकेत; कल्याणमधील धक्कादायक टोळीचा पर्दाफाश
Kalyan शहरात एका अत्यंत धक्कादायक आणि सं...
Continue reading
कोल्हापूर : आयुष्यातील काही जखमा इतक्या खोल असतात की, काळही त्यावर मलमपट्टी करू शकत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात समोर आलेली एक अत्यंत वेदनादायी घटना सध्य...
Continue reading
साताऱ्यातील घरकुल वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा शब्द; शेतकरी कर्जमाफी, मोफत वीज आणि ‘लखपती दीदी’ अभियानाबाबतही महत्त्वाच्या घोषणा
सातारा : राज्यातील लाखो गरीब आणि गरज...
Continue reading
15 दिवसांपासून तयारी, अखेर आंदोलन पेटलं; सरकारविरोधात शेतकरी नेत्यांचा आक्रमक इशारा
मुंबईत आज कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांवरून मोठा राजकीय आणि सामाजिक संघर्ष पा...
Continue reading
कांदा उत्पादकांना अखेर दिलासा; सरकारकडून मोठा निर्णय
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर...
Continue reading
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/indapur-kidnapping-shocking-kidnapping-episode-aayi-bhawasmore-taruniche-kidnapping-7-major-shocking-details-revealed/