अकोला :
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर विधानसभा प्रचार सभेदरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्यास शेतकऱ्यांचा
सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
Related News
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड…
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
मात्र, आजवर या आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा संताप :
मागील महिन्यात मुर्तिजापूर तालुक्यातील तीन तरुण शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडू न शकल्यामुळे
आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या
गावातील शिवारातील माती गोळा करून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
नागपूर येथील शासकीय निवासस्थानी नेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.
पोलीसांनी केली अटक :
आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि काही शेतकरी नागपूरकडे निघाले
असताना मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांची मागणी :
शेतकरी आणि त्यांच्या संघटनांचा सरकारकडे ठाम आग्रह आहे की,
दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हलका करून आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-chorratyancha-devasthanavar-halla/