नवी दिल्ली | ९ मे २०२५ — भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून
चंदीगड आणि अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चंदीगडमधील वेस्टर्न कमांड आणि अंबालामधील एअरफोर्स स्टेशन यामुळे हे ठिकाण महत्त्वाचं मानलं जातं.
Related News
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा अकोला दौरा; अकोट येथे विवाह समारंभास उपस्थिती
संशयास्पद माहितीवर विश्वास ठेवू नका;
सराफा दुकानात पुन्हा ‘बंटी-बबली-आजी’ टोळीचा हात;
अकोल्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात मोठा खुलासा; किरीट सोमय्यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
आपत्कालीन स्थितीसाठी तयार राहा!
चेन चोरी करणाºया महिलेला सहा तासात केली अटक
मान्सून लवकर येणार! महाराष्ट्रात १० जूननंतर पावसाची शक्यता
भारतीय सेनेला विराट कोहलीचा सलाम
सायरन कधी वाजतो? – हवाई हल्ल्याच्या धोक्यावेळी नागरिकांना मिळतो किती वेळ वाचण्यासाठी?
जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे आवाहन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही दलप्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक;
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात, पाकिस्तान सीमेपासून २० किलोमीटर परिसरातील
गाव रिकामे करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
जैसलमेरमध्ये लष्करी तळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेतली जात आहे.
जम्मू-कश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला
असून पाकिस्तानच्या ‘धनधार’ पोस्टवर प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये ११ ठिकाणी ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले.
जम्मू एअरपोर्ट आणि पठाणकोट एअरबेस सुद्धा पाकिस्तानी सुसाइड ड्रोनच्या निशाण्यावर होते.
भारताच्या डिफेन्स सिस्टीमने S-400 आणि आकाश मिसाईल
वापरून बहुतेक हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानचे ५० हून अधिक ड्रोन भारताने पाडले आहेत.
पठाणकोटजवळ एक पाकिस्तानी फायटर जेट पाडल्याची माहिती आहे,
मात्र यास अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
कर्नाटकात भारतीय सैन्याला पाठिंबा दर्शवत तिरंगा यात्रा काढण्यात आली.
विविध राज्यांतील नेत्यांनी भारताच्या लष्कराशी एकजूट दाखवून देशाच्या रक्षणासाठी उभं राहण्याचा संदेश दिला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/lucknow-maharana-pratap-jayantiinimitta-tyachanya-putuyala-pushpanjali/