पातुर प्रतिनिधी |
माळराजुरा घाटावरील पातुर तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही,
नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे बोर्डी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.
Related News
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
त्यामुळे पातुर, चिंचखेड, बोडखा, शिरला, भंडाराज व तांदळी या तलवाखालील सहा गावांतील
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विहिरी, हातपंप आणि बोरवेलची पातळी खोल गेली
असून जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
कोरड्या नदीपात्रामुळे जंगली आणि हिंस्र प्राणी गावात शिरकाव करत असून नागरिक भयभीत झाले आहेत.
पाण्याअभावी फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
दोन महिन्यांपासून सुरू असलेली पाणीटंचाई आता विकोपाला गेली आहे.
नागरिकांची दैनंदिन वणवण सुरू असून प्रशासनाकडून ठोस पावले न उचलल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की, “सिंचन विभागाचे कार्यकारी
अभियंता यांना ७ एप्रिल रोजी पाणी सोडण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.
लवकरच पातुर तलावाचे पाणी नदीपात्रात सोडले जाईल.”