बीड :
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी गाजत असलेल्या
वाल्मिक कराड प्रकरणात नवे खुलासे समोर आले आहेत. बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी
विश्वांभर गोल्डे यांनी दिलेल्या जबाबात अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
Related News
मनभा | २७ जून २०२५ –
२५ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मनभा परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक...
Continue reading
मुंबई | २७ जून २०२५ – हिंदी सक्तीच्या जीआरवरून सरकारनं मागे हटल्याचा
दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला आहे.
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे मराठी म...
Continue reading
मुंबई | २७ जून २०२५ – महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "पहिली ते...
Continue reading
मुर्तिजापूर | २९ जून २०२५ – अकोला जिल्ह्याचे नवीन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या
संतोष एन. साळुंके यांचे Vocational Instructors Teachers Association (V...
Continue reading
अकोट
एम.आय.टी.कॉलेज पुणे द्वारा आयोजित वैश्विक मूल्यादिष्ठीत परीक्षेमध्ये श्री शिवाजी विद्यालय अकोटची गौरी
गोपाल मुंडोकार हि विदर्भातून प्रथम आल्याबद्दल तिला २५ हजार रुपये रो...
Continue reading
अकोट
अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी गौणखनिज 32 लाख रुपये थकित दंड प्रकरणात अकोट तहसीलदार यांचे
कडून न्यायालयाच्या व वरिष्ठांच्या आदेशाला तहसीलसरांनी केराची टोपली दाखवली...
Continue reading
वाशिम, २९ :
वाशिम तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या अनसिंग येथील शृंगऋषी मंदिरात २९ जून
रोजी सकाळी एक अद्भुत आणि अनपेक्षित घटना घडली. मंदिरातील प्राचीन कुंड...
Continue reading
पिजर प्रतिनिधी
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ज्ञानप्रकाश विद्यालय , व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूल,
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना जागतिक अमली प...
Continue reading
अकोला | २६ जून २०२५
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अकोला जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘MISSION उडान – व्यसनमुक्तीची एक संकल्प मोहिम’
या जनजागृती उपक्रमाचे भव्य आयोजन करण्य...
Continue reading
“खड्डे बुजवू शकले नाहीत, ते मंदिरासाठी काय निधी आणणार?” – गिरीश जोशी यांचा सवाल
अकोला | राजेश्वर मंदिराच्या 'ब' वर्ग दर्ज्यावरून अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
भाजपाच...
Continue reading
दानापुर (वा)..
तेल्हारा तालुक्यातील क्रमांक एकची असलेली ग्राम पंचायत दानापुर येथे दिनांक26/06/2025 रोजी राजर्षी
शाहु महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या क...
Continue reading
थरूर यांची "ऑपरेशन सिंदूर", भारत-रशिया संबंधांवर चर्चा; काँग्रेसमध्ये वाद शिगेला
कॉंग्रेस नेते शशि थरूर सध्या रशियात खासगी दौऱ्यावर असून त्यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्...
Continue reading
विशेष म्हणजे कराड सध्या तुरुंगात असूनही त्याच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात दहशत कायम असल्याचा दावा खुद्द पोलिस अधिकाऱ्याने केला आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात वाल्मिक कराड गँगवर संशय घेतला गेला होता. यानंतर राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं.
सीआयडी व एसआयटीच्या संयुक्त तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.
गोल्डे यांचा जबाब : तुरुंगातूनही दहशत
२३ फेब्रुवारी २०२५ रोजी सीआयडीने गोल्डे यांचा जबाब नोंदवला. या जबाबात त्यांनी नमूद केलं की,
“वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी बीडमध्ये त्याच्या समर्थकांकडून दहशत कायम आहे.“
एवढंच नव्हे, तर कराडला पूर्वीपासून गुन्हेगार म्हणून ओळख असूनही त्याला बीड पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचंही त्यांनी सूचित केलं.
गुन्हेगारी इतिहास आणि बंदोबस्त
वाल्मिक कराडला आवाडा एनर्जी कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात अटक करण्यात आली.
त्यानंतर संतोष देशमुख हत्येप्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्या बंदोबस्तासाठी १८ पोलीस
आणि २ आरसीपी प्लाटून तैनात करण्यात आले होते. यावरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
रत्नागिरीहून आलेली महिला आणि नवा गूढ तपशील
दरम्यान, हत्याप्रकरणातील एक संशयित कृष्णा आंधळे याचा शोध सुरू असतानाच मस्साजोगमध्ये देशमुख
कुटुंबीयांच्या घरी एक अज्ञात महिला दाखल झाली. ती महिला म्हणाली, “माझ्याकडे कृष्णा आंधळेबाबत पुरावे आहेत.”
या महिलेने घराबाहेरच्या मंडपात रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी घरातील बाथरूममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट धरला.
पोलिसांनी तिच्या ओळखीचा तपास सुरू केला असून, ती रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे.
बीड पोलिस दल नव्या वादात
या सगळ्या प्रकरणामुळे बीड पोलिस दलाची विश्वसनीयता आणि कार्यशैली यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तुरुंगात असलेला गुन्हेगार जिल्ह्यात कार्यरत असतो, त्याचे समर्थक पोलीस ठाण्यात गोंधळ घालतात,
आणि तरीही कार्यवाही होत नाही – या सगळ्या घडामोडी पोलीस दलासाठी डोकेदुखी बनल्या आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-yanchayavar-ashish-shelar-or-ghangak/