अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अळोशी आणि कळोशी गावांच्या शेतशिवारात वन्यजीव प्राणी रोही यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. गेल्या काही दिवसांत रोहींच्या कळपांनी रात्रीच्या वेळी शेतात घुसून पिकांची नासधूस केल्याच्या घटना वाढल्या असून, एका शेतकऱ्याचे तब्बल तीन एकर क्षेत्रातील उभे गहू पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची घटना समोर आली आहे.
संबंधित शेतकऱ्याने तीन महिन्यांपासून मेहनत घेऊन गहू पीक जोपासले होते. कापणीच्या उंबरठ्यावर असताना अचानक रोहींनी शेतात धुमाकूळ घालत संपूर्ण पीक फस्त केले. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असून, हंगामातील उत्पन्नावर पाणी फिरले आहे. या प्रकारामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांनी सांगितले की, रोहींचा वावर दिवसेंदिवस वाढत असून रात्री शेतात जाणे धोकादायक बनले आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून योग्य उपाययोजना कराव्यात, रोहींचा बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Related News
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, आता DA थेट 60 टक्क्यांवर
सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, बँक अकाउंटमध्ये होणार अधिक रक्कम जम...
Continue reading
सोलापूर : महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे. दिवसरात्र शेतात राबून, पिकासाठी जीवा...
Continue reading
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाणारे Manoj Jarange Patil यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापवणारे विधान केले आहे. त...
Continue reading
बळीराजाच्या कष्टाची क्रूर चेष्टा! 12 क्विंटल कांदा विकला, पण हातात दमडीही नाही; उलट भरावा लागला 1 रुपया
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण
Continue reading
अकोल्यात भोंदूबाबाचा अंधश्रद्धेचा काळा बाजार उघड; पोही गावात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील पोही गावातून अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या एक...
Continue reading
अकोला शहरात आज वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व शाखेच्या वतीने महानगरपालिकेविरोधात एक भव्य आणि आक्रमक घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा सकाळी 11:30 वाजता गांधी जवाहर प...
Continue reading
आज अकोल्यात बुवाबाजीविरोधी परिषद; प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान ठरणार आकर्षण
अकोला शहरात अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले अस...
Continue reading
डोणगावपासून जवळच असलेल्या पांगरखेड या आदर्श गावात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. लोंबकळलेल्या विद्युत तारेच्या घर्षणामुळे निर्म...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/wadegawat-mokat-kanincha-thaiman-30-people-chava-4-patients-referred-to-akola/