पातूर, २५ मार्च २०२५ – मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या
बी.एड. सीईटी परीक्षेसाठी अवघ्या दोन मिनिटे उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागले.
कापशी येथील श्री इन्फोटेक ऑनलाइन परीक्षा केंद्रावर घडलेल्या या
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.
गाडी पंचर झाल्यामुळे विलंब; प्रवेश नाकारला
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी ८:३० पर्यंत हजर राहण्याचे निर्देश होते.
मात्र, अभिषेक फलटणकर (शिवणी, मंगरूळपीर, जिल्हा वाशिम) आणि अंकित राऊत
(बेलखेड, तालुका तेल्हारा) हे दोघे नऊ वाजून दोन मिनिटांनी परीक्षा केंद्रावर पोहोचले.
गाडी पंचर झाल्याने त्यांना विलंब झाला होता, असे सांगून त्यांनी परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांना विनवण्या केल्या.
मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण न ऐकता त्यांना प्रवेश नाकारला, परिणामी दोघांना परीक्षेस मुकावे लागले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम; वरिष्ठांकडून हस्तक्षेपाची मागणी
या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परीक्षेला बसण्याचा त्यांचा संधी गमावल्याने दोघांवर मानसिक तणावाचे संकट ओढवले आहे.
परीक्षा प्रक्रियेतील लवचिकता आवश्यक – नागरिकांची प्रतिक्रिया
उपस्थित नागरिकांनी परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अवघ्या दोन मिनिटांचा विलंब हा गंभीर कारण न मानता
विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले जात आहे.
विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी यासाठी वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालावे,
अशी जोरदार मागणी होत आहे.