केंद्र सरकारचा निर्णय; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती
केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची
घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती
Related News
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात कपात !
जेसीबी चालक तरुणाची गळफास लावून आत्महत्या
पावसाने विश्रांती घेतली असली तरी तो पुन्हा आपला जोर दाखवणार…
पातूरच्या माळराजुरा फाट्यावर बर्निंग ट्रकचा थरार
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात साजरा
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
दिली. त्यांनी त्यांच्या X खात्यावर लिहिले की, हा निर्णय पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या
दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग
अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ
लोकांना देणे सोपे होणार आहे. मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी
भरपूर संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. लडाखच्या लोकांच्या
हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले.
5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये
विभाजन करण्यात आले. यानंतर लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला.
दुसरा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर आहे. पाच वर्षांपूर्वी याच
दिवशी तत्कालीन राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात
आले होते. केंद्रशासित प्रदेश असल्याने लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या
थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येतो.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-workers-rally-outside-aditya-thackerays-hotel/