अकोला, 28 मार्च: वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या
आवाहनावर मुस्लिम समाजाने आज अकोला शहरात शांततापूर्ण आंदोलन केले.
जुम्मेच्या नमाजदरम्यान काळी पट्टी बांधून विधेयकाचा निषेध करण्यात आला.
Related News
Post Office Kisan Vikas Patra (KVP) Scheme : फक्त 9 वर्षात तुमचे पैसे दुप्पट करणारी सुरक्षित गुंतवणूक!
liver खराब होण्याची 5 धोकादायक लक्षणे तुम्ही दुर्लक्ष करू नयेत!
सकाळी Banana खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे – वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक!
Raghav Chadha Viral Video : 5 कारणं का लोकांच्या मनावर पडला प्रभाव
Diabetes ची त्वचेवरची 6 चेतावणी चिन्हे – लवकर ओळखणे आवश्यक!
EPF खात्यातील मोठी समस्या संपवा: जन्मतारीख बदलण्यासाठी 5 अत्यावश्यक स्टेप्स
मोठी बातमी: भटक्या कुत्र्यांसाठी Mika Singh ची दर्यादिली, 10 एकर जमीन दान करण्याचा ऐतिहासिक निर्णय
ATM मधून पैसे काढणे झाले महाग: SBI च्या 7 नवीन नियम जाणून घ्या!
Green Cardamom and Black Cardamom : जाणून घ्या 7 अद्भुत फरक
Saag चविष्ट होणारच! ‘या’ 5 जबरदस्त टिप्समुळे घरचा साग बनेल अप्रतिम
In America कारलीची किंमत पाहून हैराण व्हाल : 5 महागलेले रहस्ये उघडकीस!
₹3000 under the Ladki Bahin Scheme : 5 महत्वाच्या गोष्टी जे प्रत्येक महिलेला माहित असाव्यात!
शहरातील प्रमुख मशिदींसह कच्छी मशीद येथेही मोठ्या संख्येने नमाजी सहभागी झाले.
या वेळी कच्छी मशीदचे अध्यक्ष जावेद जकरिया, साकिब मेमन, वाहिद मुसानी,
जावेद खान, तनवीर खान, कासम खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विधेयकाविरोधातील भूमिका:
मुस्लिम समाजाच्या मते, वक्फ सुधार विधेयक 2025 हा एक कट असून, यामुळे मस्जिदी, ईदगाह,
मदरसे, दरगाह, खानकाह, कब्रस्तान आणि अन्य धर्मार्थ संस्थांवर गदा येऊ शकते.
विधेयक मंजूर झाल्यास, देशभरातील धार्मिक स्थळे आणि चॅरिटेबल ट्रस्ट सरकारच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण होईल.
सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी सांगितले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक
आणि सामाजिक हक्कांवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करणे गरजेचे आहे.”
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील मुस्लिम समाजाला जुम्मेच्या नमाजवेळी काळी
पट्टी बांधून शांततापूर्ण निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
नमाजीनांनी सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली.
