अकोला, 28 मार्च: वक्फ सुधार विधेयक 2025 च्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या
आवाहनावर मुस्लिम समाजाने आज अकोला शहरात शांततापूर्ण आंदोलन केले.
जुम्मेच्या नमाजदरम्यान काळी पट्टी बांधून विधेयकाचा निषेध करण्यात आला.
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
शहरातील प्रमुख मशिदींसह कच्छी मशीद येथेही मोठ्या संख्येने नमाजी सहभागी झाले.
या वेळी कच्छी मशीदचे अध्यक्ष जावेद जकरिया, साकिब मेमन, वाहिद मुसानी,
जावेद खान, तनवीर खान, कासम खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
विधेयकाविरोधातील भूमिका:
मुस्लिम समाजाच्या मते, वक्फ सुधार विधेयक 2025 हा एक कट असून, यामुळे मस्जिदी, ईदगाह,
मदरसे, दरगाह, खानकाह, कब्रस्तान आणि अन्य धर्मार्थ संस्थांवर गदा येऊ शकते.
विधेयक मंजूर झाल्यास, देशभरातील धार्मिक स्थळे आणि चॅरिटेबल ट्रस्ट सरकारच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण होईल.
सामाजिक कार्यकर्ते जावेद जकरिया यांनी सांगितले की, “हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक
आणि सामाजिक हक्कांवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करणे गरजेचे आहे.”
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील मुस्लिम समाजाला जुम्मेच्या नमाजवेळी काळी
पट्टी बांधून शांततापूर्ण निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
नमाजीनांनी सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली.