जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाक अधिकृत काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत.
या कारवाईनंतर देशभरात भारतीय सैन्याच्या धाडसी भूमिकेचे स्वागत होत आहे.
Related News
अकोल्यात फटाके फोडून भारतीय सेनेला सलामी
अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
अकोल्यात मुस्लिम बांधवांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष; फटाके फोडून मिठाई वाटली
“ही कारवाई थांबू नये…” – ऑपरेशन सिंदूरवर शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांची भावुक प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची निर्णायक कारवाई;
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची स्पष्ट भूमिका; “मुंबई २६/११ नंतरचा सर्वात मोठा हल्ला”
अकोला शहरात याचे पडसाद उमटले असून शिवसेना पक्षातर्फे भारतीय सैनिकांच्या शौर्याचे स्वागत करत जल्लोष करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आपल्या आनंदाची आणि अभिमानाची भावना व्यक्त केली.
यावेळी भारतमाताची जयघोष, सैनिकांना सलाम आणि देशभक्तिपर घोषणा देण्यात आल्या.
शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले, “भारतीय लष्कराने जी कारवाई केली आहे,
ती प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या भावना व्यक्त करणारी आहे. अशा धाडसी निर्णयामुळेच भारत आज सुरक्षित आहे.”
भारताने बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, कोटली, सियालकोट यांसारख्या पाकिस्तानच्या आतल्या भागात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
ही कारवाई पहिल्यांदाच पाकिस्तानच्या 100 किमी आत जाऊन पार पडली आहे.
यामुळे भारतीय नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,
अनेक ठिकाणी सैनिकांचे अभिनंदन आणि शौर्यदिन साजरे करण्यात येत आहेत.