गुरुग्राम | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या
लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी स्वामी नरवाल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Related News
10 फुटांच्या हैवानाची दहशत! लोक घर सोडून पळाले… जपानमध्ये नक्की काय घडलं? 7.6 रिश्टरच्या भूकंपाने कोसळली शांतता
जपान पुन्हा एकदा एका प्रचंड नैसर्गिक आपत्...
Continue reading
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
Continue reading
माधुरी दीक्षित आणि डॉ. शिरीराम नने : अमेरिकेतील शांत जीवनानंतर भारतात परतण्यामागील कथा
बॉलिवूडची ‘नृत्याची राणी’ माधुरी दीक्षित हे 1990 च्या दश...
Continue reading
लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास वाफ देणे योग्य की अयोग्य? डॉक्टर हिमांशू भदानी यांचा सल्ला
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला
Continue reading
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे होऊ शकते गंभीर आजाराचे कारण
आजकाल आपण सर्वच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतो, विशेषतः पाणी, रस, सॉफ्ट ड्र...
Continue reading
जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम
अकोट: जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक
Continue reading
जागतिक स्तरावर चमकलेले 4 भारतीय पदार्थ : अमृतसरी कुलचा, बटर चिकन, ह्यदराबादी बिर्याणी आणि शाही पनीर ‘टेस्ट अॅटलस’च्या टॉप १०० पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले
भारतीय खाद्यसंस्कृती ...
Continue reading
चाणक्य नीती: असे लोक जर तुमच्या घरात असतील, तर सावधान! तुमच्या जीवाला धोका असू शकतो
चाणक्य नीती: आयुष्यात प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची इच्छा असते, पण कधी कधी आपल्या घ...
Continue reading
मोत्याची अंगठी घालण्याचे फायदे आणि योग्य पद्धत – ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मार्गदर्शन
आजकाल फॅशन आणि सौंदर्याच्या दृष्टीने अंगठी, हार किंवा इतर दागिन...
Continue reading
त्या गुरुग्राम येथील त्यांच्या निवासस्थानी एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
या भावुक संवादात त्यांनी अश्रूंनी भरलेल्या आवाजात सांगितलं – “ही कारवाई इथेच थांबू नये, दहशतवाद पूर्णतः नष्ट झाला पाहिजे.”
हिमांशी म्हणाल्या, “माझ्या पतीने सैन्यात प्रवेश घेतला तो देशात शांतता यावी म्हणून.
आज तो माझ्यासोबत नाही, पण त्याचा आत्मा ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होता असं मला वाटतं.
मी सरकारकडे विनंती करते की विनयला शहीदाचा दर्जा मिळायला हवा.”
“ऑपरेशन सिंदूर” हे नाव योग्यच – हिमांशी
हिमांशी म्हणाल्या, “या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देणं अतिशय योग्य आहे.
माझं लग्न नुकतंच झालं होतं… पण एका क्षणात माझं संपूर्ण आयुष्य उलथून गेलं.
ज्या महिलांनी आपल्या पतीला गमावलं, त्यांचा दु:ख मी जाणते. त्यामुळे अशा प्रकारचं काही पुन्हा घडू नये.”
“महिलांनी अशा ऑपरेशन्समध्ये पुढे यावं”
भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भाग घेतल्याबद्दल हिमांशी म्हणाल्या,
“हे एक प्रेरणादायी पाऊल आहे. एक महिला दुसऱ्या महिलेच्या वेदना समजू शकते. अशा कारवायांमध्ये अधिक महिलांना संधी मिळावी.”
“मी ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही”
काही जुन्या वक्तव्यांवरून सोशल मीडियावर ट्रोल केल्याबद्दल हिमांशी म्हणाल्या,
“लोकांची मानसिकता मी बदलू शकत नाही. पण कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये, एवढंच मला वाटतं.”
शेवटी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “घटनेच्या वेळी विनयकडे शस्त्र असतं,
तर तो निश्चितच दहशतवाद्यांना उत्तर दिलं असतं. ते देशासाठी सर्वोच्च सन्मानाचे पात्र आहेत.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduramadhye/