अकोला शहरातील खडकी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या गोडाऊनला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास गोडाऊनमधून धूर निघताना दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागल्यानंतर प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशामन दलाची गाडी सुमारे एक तास उशिराने घटनास्थळी पोहोचल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. याशिवाय आलेला अग्निशामन बंब निकामी असल्याची माहितीही समोर आली असून त्यामुळे आग विझविण्यात फारसा उपयोग झाला नाही.दरम्यान, मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Related News
read also : https://ajinkyabharat.com/aditi-sarangdhars-powerful-avatar-as-a-villain-in-sanai-choghade/
