विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत.
नवीन अटींनुसार, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना तसेच
चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
मुख्य बदल:
- उत्पन्न मर्यादा – वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ बंद.
- वाहन निकष – कुटुंबात चारचाकी गाडी असल्यास योजनेस अपात्र.
- शासकीय नोकरीतील महिलांना लाभ नाही.
- परराज्यात विवाह झालेल्या महिलांना लाभ मिळणार नाही.
- दरवर्षी ई-केवायसी आणि हयातीचा दाखला आवश्यक.
- आधार लिंक नसलेल्या महिलांना लाभ नाकारला जाणार.
9 लाख महिला होणार अपात्र
याआधी 5 लाख महिलांचे अर्ज बाद झाले होते. आता आणखी 4 लाख महिलांचा
लाभ बंद होणार असून, सरकारला यामुळे 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
1500 रुपये बंद होणार का?
ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नाही, ज्या एकावेळी इतर योजनांचा लाभ घेत आहेत
किंवा बँक खात्यावरील नाव अर्जातील नावाशी जुळत नाही, अशा महिलांचा लाभ थांबवला जाणार आहे.
तपासणी सुरू
नमो योजना किंवा दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकत्रित 1500 रुपयांपेक्षा
अधिक मिळणार नाही. यासाठी सर्व विभागांकडून माहिती संकलन सुरू आहे.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/satanavan-sajal-vihir-appeared-day/