अकोला, दि. ५ – महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच वर्षांत वीज दरात २३ टक्के कपात केली जाणार असून,
याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या कुशल नेतृत्वाखालील अचूक नियोजनाचे फलित आहे.
विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले हे पाऊल १३ कोटी महाराष्ट्रवासीयांसाठी कल्याणकारी ठरणार आहे.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या विस्तारामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.
यामुळे केवळ शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुनिश्चित होणार नाही तर अपारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल.
यामुळे महाराष्ट्र अधिक ऊर्जावान आणि तेजस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, किशोर पाटील,
जयंत मसणे, विजय अग्रवाल यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा कडेकोट बंदोबस्तात; ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निगराणी
राज्यात लवकरच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत.
यासाठी शिक्षण विभागाला विशेष निर्देश देण्यात आले असून,
परीक्षेचे आयोजन कॉपीमुक्त व निकोप वातावरणात होईल, याची काळजी घेतली जात आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर दोन ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे २४ तास निगराणी ठेवली जाणार आहे.
परीक्षेच्या काळात ५० मीटरच्या परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत
. प्रशासकीय पातळीवर व्हिडिओ चित्रीकरण, भरारी पथके, आणि फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे परीक्षार्थींची तपासणी केली जाणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांवरील परीक्षा तणाव कमी होईल, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
याबाबत अकोला भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
READ MORE : https://ajinkyabharat.com/shetak-yancha-jeevanman-achavanyasathi-teaching-tantra-gyan-amending/