कर्तव्य बजावण्याचे सरकारचे आवाहन
महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानानिमित्त
राज्यात सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात
Related News
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक
जस्तगावातील शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा;
मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे.
तर २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार राज्यात मतदानाच्या
दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील नागरिकांना मतदान करता
यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून २० नोव्हेंबर
२०२४ साठी सुट्टी जाहीर केली आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात
ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची
कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक
उपक्रम आणि बँक या ठिकाणी ही सार्वजनिक सुट्टी लागू असणार
आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना महाराष्ट्र
शासनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. शासनाने २० तारखेला
मतदानाची सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व मतदारांना
मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय
घेतला आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन
शासनाने केले आहे. राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने
विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. तसेच ज्यांना पूर्ण
दिवस सुट्टी देणे शक्य नसेल त्यांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर
करावी असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. दरम्यान
भाजपने आपल्या पहिल्या यादीतून ९९ उमेदवारांची घोषणा केली
आहे. शिवसेनेने ४५ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३८ उमेदवार
जाहीर केले आहेत. तसेच दुसरीकडे महाविकास आघाडीकडून
ठाकरे गटाने ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन
आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीने देखील आपले
उमेदवार जाहीर केले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/november-6-hearing-regarding-nationalist-party-symbol/