दिवसेंदिवस चांदीच्या मागणीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला
मिळत आहे. त्यामुळं यावर्षी चांदीची आयात दुप्पट होण्याची शक्यता
Related News
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात कपात !
जेसीबी चालक तरुणाची गळफास लावून आत्महत्या
पावसाने विश्रांती घेतली असली तरी तो पुन्हा आपला जोर दाखवणार…
पातूरच्या माळराजुरा फाट्यावर बर्निंग ट्रकचा थरार
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्या कार्यालयात साजरा
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये भारतातील चांदीची
आयात 6,500 ते 7000 टनांपर्यंत वाढू शकते, ज्यामुळे जागतिक
किमती देखील वाढण्याची शक्यता आहे.
एका प्रमुख चांदी आयातदाराने दिलेल्या माहितीनुसार, भारतात
चांदीची आयात यावर्षी जवळपास दुप्पट होणार आहे. हे सौर पॅनेल
आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांकडून वाढत्या मागणीमुळे होत आहे.
तसेच, सोन्यापेक्षा चांदी चांगला परतावा देईल, असा विश्वास
गुंतवणूकदारांना वाटत आहे. जगातील सर्वात मोठ्या चांदीच्या ग्राहकाने
केलेल्या उच्च आयातीमुळं जागतिक चांदीच्या किमतींना आणखी
आधार मिळू शकेल, जे सध्या एका दशकापेक्षा जास्त काळातील
सर्वोच्च पातळीच्या जवळ आहेत. गेल्या वर्षी भारताने 3,625 टन चांदीची
आयात केली होती. मात्र, यावर्षी औद्योगिक मागणी वाढल्याने यावर्षी
चांदीची खरेदी 6,500 ते 7,000 टन दरम्यान होऊ शकते.
2024 च्या पहिल्या सहामाहीत भारताची चांदीची आयात एका वर्षापूर्वी
560 टनांवरून वाढून 4,554 टन झाली आहे. चांदीच्या दागिन्यांना
पारंपरिक मागणी आहे. आता लोक गुंतवणुकीसाठीही खरेदी करत आहेत.
कारण स्टॅम्प ड्युटी कमी झाल्यामुळे चांदी स्वस्त झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/announcement-of-creation-of-five-new-districts-in-ladakh/