केंद्र सरकारचा निर्णय; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती
केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची
घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
दिली. त्यांनी त्यांच्या X खात्यावर लिहिले की, हा निर्णय पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या
दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग
अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ
लोकांना देणे सोपे होणार आहे. मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी
भरपूर संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. लडाखच्या लोकांच्या
हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले.
5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये
विभाजन करण्यात आले. यानंतर लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला.
दुसरा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर आहे. पाच वर्षांपूर्वी याच
दिवशी तत्कालीन राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात
आले होते. केंद्रशासित प्रदेश असल्याने लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या
थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येतो.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-workers-rally-outside-aditya-thackerays-hotel/