निंबा अंदुरा सर्कलअंतर्गत येणाऱ्या जानोरी मेळघाट परिसरात दिवसाढवळ्या बोटीद्वारे सुरू असलेल्या वाळू उत्खननामुळे स्थानिक शेतकरी संतप्त झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भागातील काजी, नागद, सागद, मोखा आदी वाळूघाटांपैकी जानोरी मेळघाट अद्याप हर्रास (लिलाव) झालेला नसतानाही येथे उत्खनन सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची जवळपास ८० टक्के शेती नदीपात्रात आहे. सध्या या जमिनीवर हायब्रीड ज्वारीचे पीक चांगल्या स्थितीत असून उत्पादनाबाबत शेतकरी आशावादी आहेत. मात्र नदीकाठावर सुरू असलेल्या वाळू उत्खननामुळे पाण्याचा प्रवाह बदलण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर मोठ्या प्रमाणावर वाळू काढली गेली, तर पुढील वर्षी नदीचा ओघ थेट शेतीकडे वळू शकतो आणि संपूर्ण जमीन पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.
Related News
अकोट–अकोला मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य ; संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला
Bhiwandi Dog Bite Tragedy: 22 दिवसांनी 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय चुकलं? 7 धक्कादायक तथ्ये
मांजाने युवकाचा गळा चिरला; दुचाकीस्वार गंभीर जखमी
डोणगाव परिसरातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह
पातूर तहसील येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा मान्यवरांच्या हस्ते शिधापत्रिकेचे वितरण
दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी त्वरित द्या, अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप – लोहारा ग्रामस्थांचा इशारा
मूर्तिजापूरचे ‘देवदूत’ डॉक्टर गौरव गोसावी यांचे निधन
मांज्याने बोरीतील तरुण गंभीर जखमी
“ अकोला शहरात विजेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू; ठेकेदारी पद्धतीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह”
शेतकऱ्यांनी याबाबत बाळापूर तहसील कार्यालयाला माहिती दिल्याचे सांगितले, परंतु कोणतीही तातडीची कारवाई झाली नाही, असा आरोप आहे. महसूल विभागालाही परिस्थितीची कल्पना असूनही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
विशेष म्हणजे, देऊळगाव (ता. संग्रामपूर तालुका) येथील काही घटकांच्या माध्यमातून बोटीद्वारे उत्खनन होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संग्रामपूर तालुक्यातील काही घाटांचा लिलाव झालेला असला तरी जानोरी मेळघाट भाग अद्याप लिलाव प्रक्रियेत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे “ज्या भागाचा लिलाव झाला आहे, तेथेच उत्खनन करावे; आमच्या भागात करू नये,” अशी मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात जानोरी मेळघाट येथील शेतकरी शिवहरी मस्के म्हणाले, “आमचे ज्वारीचे पीक सध्या डौलाने उभे आहे. मात्र यावर्षी जर वाळू उत्खनन झाले, तर पुढील वर्षी आम्हाला ज्वारी, गहू किंवा कांद्याचे पीक घेणेही शक्य होणार नाही. आमचा घाट हर्रास झालेला नाही, त्यामुळे येथे उत्खनन थांबवावे.” त्यांनी पुढे सांगितले की, सकाळी दहाच्या सुमारासच तहसील कार्यालयाला याची माहिती देण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे यांनी सांगितले, “संग्रामपूर तालुक्यातील घाटांचा लिलाव झालेला आहे. आमच्या भागातील घाटांचा लिलाव प्रक्रिया बाकी असून लवकरच तेथे आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.”
तथापि, स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की कारवाईची केवळ आश्वासने देऊन चालणार नाही; प्रत्यक्षात उत्खनन तात्काळ थांबवणे आवश्यक आहे. अन्यथा पर्यावरणीय हानीसोबतच शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. नदीपात्रातील अनियंत्रित वाळू उपसा हा भूक्षय, पाण्याची पातळी घटणे आणि पूरस्थिती निर्माण होणे यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
सध्या तरी प्रशासनाकडून प्रत्यक्ष तपासणी आणि कठोर कारवाईची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. “आमच्या शेतीचा प्रश्न आहे; वेळेत निर्णय घेतला नाही तर पुढील हंगाम धोक्यात येईल,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जानोरी मेळघाटातील वाळू उत्खननाचा मुद्दा आता गंभीर बनला असून महसूल विभागाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
