शेतकरी कर्जमुक्त करा, उद्धव ठाकरेंची मागणी
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा,
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा.
त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना आणा.
महिला-पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेत केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की,
राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जातो
आणि पंचतारांकित शेती करतो.
विशेषतः अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यावर घणाघात करत राज्यात सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करतायेत.
१० हजार २२ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.
घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही.
पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही. चित्रविचित्र गोष्टी राज्यात सुरू आहेत.
त्यामुळे डबल इंजिन सरकार आलंय,
कसंबसं एनडीएचं सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आलंय.
नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी २ लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती.
त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून
निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा असं त्यांनी म्हटलं.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कर्जमुक्तीची घोषणा अद्याप पूर्ण झाली नाही.
नुसत्या घोषणा करू नये. अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा.
मंत्र्यांना इतर कामे बरीच आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही.
जनतेचा वाली कोणी राहिला नाही.
ज्याप्रमाणे मध्य प्रदेशात लाडली बहना अशी योजना आहे
तशी राज्यात लाडकी बहीण योजना आणतायेत.
मुली मुलांमध्ये भेदभाव करू नका, मुलींप्रमाणेच मुलांनाही योजना आणा.
पोलीस भरतीत साडे सतरा हजार जागांसाठी लाखो अर्ज आलेत.
भरतीसाठी आलेल्या तरुणांना राहण्याची व्यवस्था नाही.
अनेक ठिकाणी सोयीसुविधा नाहीत.
बेकारी वाढत चालली आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/sam-pitroda-once-again-appointed-as-overseas-congress-chief/