श्रीकांत पाचकवडे
अकोला : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा दंड थोपटून आमने-सामने उभे ठाकलेल्या भाजप विरुद्ध काँग्रेस मध्ये काट्याची टक्कर झाली आहे. त्यामुळे मतदानानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा केल्या जात असुन केंडर बेस भाजपमध्ये फिलगुडचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेसच्या लढतीत वंचीत विजयाचा मार्ग सुकर करेल कां? असाही कयास लावल्या जात आहे.
देशात लोकसभेच्या 18 व्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता.26) मतदान घेण्यात आले. गत निवडणुकीत या मतदारसंघात सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजप विरुद्ध वंचीत अशी थेट लढत होऊन काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली होती.
Related News
जालौन (उत्तर प्रदेश) :
मोमोज खाण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांतील मुलींमध्ये प्रचंड वाद झाला आणि याचे
रूप रस्त्यावर तुंबळ मारामारीत झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर...
Continue reading
मुंबई :
भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि भरभरून दान देतात.
असंच एक श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र म्हणजे रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिर....
Continue reading
चेन्नई सुपर किंग्स (CSK) या हंगामात 9 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकू शकली आहे.
सध्या CSK केवळ 4 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तळाशी आहे. तरीही महेंद्रसिंह धोनी यांच्या
नेतृत्वाखालील...
Continue reading
महत्त्वाचे ठळक मुद्दे :
२४ राज्यांमध्ये वादळ आणि वीजेचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.
सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन; १००० पर्यटक सुरक्षित बाहेर, १५०...
Continue reading
पंजाब :
पंजाब सीमेवर सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बीएसएफच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर,
बीएसएफच्या सतर्क जवानांनी आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवा...
Continue reading
मिर्झापूर (उत्तर प्रदेश) :
जिल्ह्यातील भीषण अपघातात गिट्टीने भरलेला ट्रक एका अॅम्ब्युलन्सवर
उलटल्यानंतर मोठी दुर्घटना घडली. ट्रकच्या खाली दबून
अॅम्ब्युलन्समधील चार जणांचा मृत्य...
Continue reading
भिवंडी :
राज्यात उष्णतेचा तडाखा वाढत असताना, भिवंडी तालुक्यातील राहणाळ गावात
भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. स्वागत कंपाउंडमधील फर्निचरच्या
गोदामाला आग लागून तब्बल ७ ते ८ गोदा...
Continue reading
अकोला :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेले अकोल्याचे ३१
पर्यटक अखेर सुखरूप मायगावी परतले आहेत. गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले
ह...
Continue reading
नूंह (हरियाणा):
शनिवारी सकाळी नूंह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर
इब्राहिमबास गावाजवळ एक भीषण अपघात घडला. या अपघातात ७ सफाई कर्मचा...
Continue reading
लाहौर (पाकिस्तान):
पाकिस्तानच्या लाहौरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी भीषण आग लागली.
या घटनेनंतर विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्काळ थांबवण्यात आली आहेत.
...
Continue reading
भोपाल:
मध्यप्रदेशात पोलीस महासंचालक (DGP) कैलाश मकवाणा यांनी एक नवा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मंत्री आणि आमदारांना 'सलाम' (सैल्यूट)
कर...
Continue reading
नवी दिल्ली:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम आता देशाच्या हवाई वाहतुकीवरही जाणवू लागला आहे.
अनेक उड्डाणे विलंबाने होत असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना स...
Continue reading
यंदा मात्र, भाजपच्या मराठा कार्डला काँग्रेसने मराठा कार्डनेच उत्तर दिल्याने मतदारसंघात सत्ताधारी भाजपचे अऩुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यातच थेट लढत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. मतदारसंघातील राजकीय समीकरण पाहता बाळापुर, अकोला पश्चिम, रिसोड मतदारसंघात काँग्रेसने हात मारल्याची चर्चा आहे. तर अकोला पुर्व, अकोट, अकोला पश्चिमचा काही भागात कमळ फुलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप आणि काँग्रेसच्या या लढतीत वंचीत बहुजन आघाडीनहेी सोशल इंजिनिअरिंगचा फंडा यशस्वी करण्यावर भर दिल्याचे बोलल्या जाते.
या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघ हा निर्णायक भुमिकेत असुन या मतदारसंघात मराठा, कुणबी, मुस्लीम, बौद्ध, माळी समाजाचे प्राबल्य आहे. या मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिल खोलके डॉ. अभय पाटलांना साथ दिल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात सर्वांधिक 66.58 टक्के मतदान बाळापुर मतदारसंघात झाल्याचे पहावयास मिळाले.
एकदंरीत काही मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत तर काही ठिकाणी तिरंगी लढत झाल्याने विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. सध्या तरी प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार विजयी होईल, असे दावे करीत असले या निवडणुकीत मतदारराजा कोणाला लोकसभेत पाठवतो? हे चार जुनला जाहीर होणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.