बाळापूर (१२ जून) – निंबा अंदुरा सर्कल अंतर्गत गट ग्रामपंचायत मोखा जानोरीमेळ परिसरात
बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे जानोरीमेळ गावात मोठे नुकसान झाले आहे.
अवघ्या २० मिनिटांच्या वादळात अनेकांच्या घरावरील पत्रे, अँगलसह उडून गेले,
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
शेतमाल आणि घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात वाहून गेल्या.
रमेश परघर मोर यांच्या धान्याच्या गोडाऊनवरील तीन पत्रे अँगलसह उडून गेली.
त्यांच्या गोदामातील १५ पोते ज्वारी, १२ पोते गहू, ६ पोते हरभरा व ८ पोते तुर पाण्यात खराब झाले.
प्रकाश परघर मोर व संजय परघर मोर यांच्या राहत्या घरावरचे संपूर्ण पत्रे अँगलसह उडून गेले.
त्यांच्या टीव्ही, फ्रिज, सोफासेट, पंखे, शालेय साहित्य, गॅस शेगडी, कपडे व किराणा माल यांसह संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला.
या घटनेची तत्काळ दखल घेत तहसीलदार बाळापुर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आकाश वानखडे,
ग्रामसेवक कैलास संस्कार, सरपंच पती श्री. हर्ष खरप, पंचायत सदस्य बबलू देशमुख,
तसेच शेतकरी संघटनेचे अनिल धुमाळे, रोजगार सेवक संघटनेचे
जीवन परघर मोर व सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
संकटग्रस्त कुटुंबांना तातडीने साखर, तांदूळ, डाळी, मसाले, चहा,
आटा यांचा किराणा साहित्याचा पुरवठा करण्यात आला.
जखमींना वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ निंबा येथे दाखल करण्यात आले.
सरपंच पती श्री. हर्ष खरप व पंचायत सदस्य बबलू देशमुख यांनी सांगितले की, “शासनस्तरावरून या कुटुंबांना
लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार नितीन बापू देशमुख
यांच्या माध्यमातून सरकार दरबारी मदतीची मागणी लवकरच केली जाणार आहे.”
जानोरीमेळप्रमाणेच वझेगाव येथेही रवींद्र माळी व गणेश माळी यांच्या घराचे नुकसान झाले
असून स्थानिक प्रशासन आणि पंचायत समितीच्या प्रतिनिधींनी तिथेही भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे.
प्रभावितांनी व्यक्त केलेली भावना:
“निसर्गाच्या रौद्र रूपापुढे माणूस हतबल ठरतो, आमचा काळ आला होता पण वेळ नव्हती…” – प्रकाश आणि संजय परघर मोर