दानापूर (प्रतिनिधी):
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी दानापूर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आणि गारपिटींनी
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
Related News
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
महावितरणने केली मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
आर्यन मेश्राम ने मैन ऑफ द मैच बनकर NECO मास्टर ब्लास्टर को नागपुर टाइटंस पर 9 विकेट से दिलाई शानदार जीत
विदर्भ प्रो T20 लीगमध्ये NECO मास्टर ब्लास्टरच्या 9 गडी राखून विजयात आर्यन मेश्राम चमकदार – सामना विजेता घोषित
डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या तेराव्या कथासंग्रहांचे प्रकाशन संपन्न
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
यामध्ये दानापूर येथील शेतकरी निखिल रामराव मिसाळ यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांच्या
सर्वे नं. ३६३ मधील एक हेक्टर ६२ आर क्षेत्रातील केळीचे घड व झाडे पूर्णपणे मोडून पडली आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
दिनांक १६ मे २०२५ रोजी या नुकसानीची माहिती मिसाळ यांनी व अन्य शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १४४४७ वर दिली होती.
त्यानंतर स्थानिक पटवारी अंकुश मानकर आणि कृषी सहाय्यक महेश इंगळे यांनी प्रत्यक्ष
पाहणी करून पंचनामा तयार केला व शासनाकडे अहवालही सादर केला.
मात्र, विमा कंपनीने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. मिसाळ यांच्या मते, त्यांनी दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी विमा
कंपनीकडे अधिकृतपणे विमा हप्ता भरलेला असूनही, आजतागायत कंपनीकडून कोणतेही सर्वेक्षण किंवा नुकसानीचे मूल्यांकन झालेले नाही.
वारंवार तक्रार करूनही विमा कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
“शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीचा सन्मान करून योग्य ती भरपाई देणे हे विमा कंपनीचे कर्तव्य आहे.
मात्र कंपनीकडून आमच्याकडे केवळ दुर्लक्षच झाले आहे.
ही शेतकऱ्यांसोबतची घोर अन्यायकारक बाब आहे,” असे मिसाळ यांनी सांगितले.
त्यांनी विमा कंपनीला नोटीस देत असा इशारा दिला आहे की,
जर लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला नाही, तर ही तक्रार ग्राहक मंचासमोर नेण्यात येईल.
Read Also : https://ajinkyabharat.com/chief-officer-dr-bambare-yancha-sanman-kartana-and-bharsaka-and-others/