मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हादरा बसला आहे.
मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
संजय तुर्डे मुंबईतील कालिना विभागातून निवडून आले होते.
दरम्यान, संजय तुर्डे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजय तुर्डे यांना आपल्याकडे वळविण्यात शिंदे सेनेला यश मिळाले आहे.
संजय तुर्डे यांच्यासोबत कलिना परिसरातील मनसेचे पदाधिकारी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे गटाचा हा विजय मानला जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत मनसेचे एकूण सात उमेदवार विजयी होऊन मुंबई महानगरपालिकेत दाखल झाले होते.
त्यापैकी माजी नगरसेवक दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर,
डॉ. अर्चना भालेराव, हर्षला मारे या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
मात्र संजय तुर्डे यांनी मनसेत कायम राहण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळे संजय तुर्डे हे मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक होते.
मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काल मोठं वक्तव्य केलं.
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार,
असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.
याचदरम्यान आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे.
यावेळी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आता थेट बातमीच देऊ- उद्धव ठाकरे
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशी चर्चा रंगलीय.
म.न.से नेते संदीप देशपांडेंनी, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावं असं म्हंटलं आणि त्यानंतर
अवघ्या तासाभरात जे जनतेच्या मनात ते होईल असं म्हणत, आता थेट बातमीच देऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-patili-ukadyachi-lat-merc/