अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे मे महिन्यातच
पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानामुळे
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
आंबा घाटात दाट धुके पसरले आहे. हे धुके पाहण्यासाठी आणि
अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक घाटात गर्दी करत आहेत.
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट हा एक निसर्गसंपन्न
आणि सौंदर्याने नटलेला प्रमुख घाटमार्ग आहे. याच आकर्षणामुळे दरवर्षी पर्यटकांची येथे वर्दळ असते.
मात्र यावर्षीच्या अनपेक्षित मान्सूनपूर्व पावसामुळे मे महिन्यातच
आंबा घाटावर धुक्याची चादर पसरली असून, पर्यटक याचा आनंद घेताना दिसत आहेत.
त्यामुळे आंबा गाव व परिसरात पर्यटकांची रेलचेल वाढली आहे.
महामार्गाचे काम संथ गतीने :
सध्या मिऱ्या-रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
घाटातील जवळपास निम्म्याहून अधिक अंतरावर रुंदीकरणाचे काम वेगाने सुरु
असले तरी आंबा घाट ते कोल्हापूर या भागातील काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
यामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/deoughatamadhye-ghadli-durdaii-incident/