गुजरातमधील दाहोद येथे सोमवारी आयोजित जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत दहशतवाद्यांना कठोर इशारा दिला.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, “जो सिंदूर मिटवेल, त्याचं मिटणं ठरलेलं आहे.”
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
मोदी म्हणाले की, २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी एका पित्याला त्याच्या मुलांसमोर गोळ्या घालून ठार केलं.
हे फक्त त्या पित्याचं नव्हे तर १४० कोटी भारतीयांचं आव्हान होतं.
मोदी पुढे म्हणाले, “मोदीशी लढणं किती कठीण आहे, हे दहशतवाद्यांनी स्वप्नातसुद्धा विचारलं नव्हतं.
मी माझ्या तीनही सेनांना मोकळीक दिली आणि त्यांनी ६ मेच्या रात्री २२ मिनिटांत ९
मोठ्या दहशतवादी ठिकाणांचं उच्चाटन केलं.” पाकिस्तानने दुस्साहस
केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानी पोस्ट्सवरही कठोर कारवाई केली.
अकल्पनीय निर्णय घेणारी सरकार – मोदी
मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की, “आमच्या सरकारने अभूतपूर्व आणि
अकल्पनीय निर्णय घेतले आहेत.
दशकांपासूनच्या बंधनांना तोडून भारत आज स्वनिर्मितीत आघाडीवर आहे.”
भारतात आता स्मार्टफोन, खेळणी, औषधे, सैन्याची शस्त्रास्त्रे, रेल्वे आणि
मेट्रोसारखी तंत्रज्ञानं तयार होऊन जगभरात निर्यात केली जात आहेत.
वलसाड-दाहोद ट्रेनचा शुभारंभ
गुजरात दौऱ्यात मोदींनी वलसाड-दाहोद ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि दाहोद
येथील लोको मॅन्युफॅक्चरिंग युनिट राष्ट्राला समर्पित केलं. यामुळे वलसाड,
वापी आणि आसपासच्या भागात काम करणाऱ्या दाहोदच्या लोकांना प्रवासासाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे.
रेल्वे आणि नागरी विकासाचे अनेक प्रकल्प
रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रेल्वे विभागाच्या
नवीन प्रकल्पांची माहिती देण्यात आली. यामध्ये स्लीपर वंदे भारत ट्रेन आणि
नवीन उत्पादन युनिट्सवर काम सुरु असल्याचंही सांगण्यात आलं.
२२,०५५ घरांचं उद्घाटन व रिवरफ्रंट विकास
पंतप्रधान मोदी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १,००६ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या
२२,०५५ घरांचं उद्घाटन करणार आहेत. यासोबतच ते साबरमती
रिव्हरफ्रंटच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजनही करतील, ज्यावर १,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mahinya-dhukyachi-chadar/