रत्नागिरी : राज्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकणात दरड कोसळण्याच्या
घटनांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विशेषतः वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वेमार्ग बंद झाला असून जनशताब्दी,
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तेजस, नेत्रावती एक्सप्रेससारख्या गाड्या विविध स्थानकांवर अडकून पडल्या आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांत दरडी कोसळल्या.
त्याचा मोठा फटका कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून,
रेल्वे ट्रॅकवर मोठमोठे दगड आल्यामुळे गाड्यांना पुढे जाता आलेले नाही.
प्रवासी ताटकळले, प्रशासन सतर्क
प्रशासनाकडून युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू असून, कोकण रेल्वे सुमारे दीड
तास उशिराने धावणार असल्याचे संकेत आहेत. नेत्रावती एक्सप्रेस सध्या रत्नागिरीत थांबली असून,
जनशताब्दी एक्सप्रेस वैभववाडीत, तर तेजस एक्सप्रेस कणकवलीत थांबली आहे.
वैभववाडी स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी अडकून पडले आहेत.
शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान
मुसळधार पावसामुळे कोकणासह मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतीचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
काही भागांत भात लागवडीपूर्वीच शेतात पाणी साचले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हवामान खात्याचा इशारा कायम
हवामान विभागाने पुढील काही दिवस कोकण आणि घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
त्यामुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रवास करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kedarnath-te-dehradunparyant-pavasacha-gesture/