श्रीनगर | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सुरु असलेल्या ऑपरेशन किलर मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे.
निशाण्यावर असलेल्या १७ दहशतवाद्यांपैकी ६ जणांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं असून उर्वरित ११ दहशतवादी अजूनही रडारवर आहेत.
Related News
ऑपरेशन किलरची झड
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांत त्राल आणि शोपियान परिसरात
प्रत्येकी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.
या ऑपरेशनमध्ये स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश असून ते लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद
आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या संघटनांशी संबंधित असल्याची माहिती आहे.
११ दहशतवादी अजूनही सक्रिय
सध्या सुरक्षा यंत्रणांचा मुख्य फोकस उर्वरित ११ दहशतवाद्यांवर आहे.
यामध्ये ८ दहशतवादी अत्यंत धोकादायक गटातील असून त्यांची नावे आधीच सुरक्षा यंत्रणांच्या यादीत होती.
यांच्यावर सतत पाळत ठेवली जात असून “दिसता क्षणी खात्मा” या धोरणानुसार कारवाई सुरु आहे.
शोधमोहीम दिवस-रात्र सुरू
दहशतवाद्यांचा पाठलाग करण्यासाठी सैन्य, CRPF आणि स्थानिक पोलिसांचे संयुक्त पथक कार्यरत असून,
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ड्रोन, थर्मल इमेजर्स, नाईट व्हिजन डिव्हायसेस चा वापर करून शोधमोहीम राबवली जात आहे.
🇮🇳 सरकारचा ठाम निर्धार
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा दहशतवादाविरोधातील पवित्रा अधिक आक्रमक झाला असून,
केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की देशाच्या सीमा असोत किंवा अंतर्गत प्रदेश –
दहशतवाद्यांना आता कोणतीही सहानुभूती किंवा संधी दिली जाणार नाही.
या मोहिमेच्या यशामुळे काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेची स्थिती अधिक मजबूत झाली असून,
नागरिकांमध्ये देखील सैन्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
आगामी काळात इतर दहशतवाद्यांचाही खात्मा होणार असल्याचा विश्वास सुरक्षा यंत्रणांनी
Read Also : https://ajinkyabharat.com/bypassworward-car-overturned-by-loot-of-gold/
