नवी दिल्ली : सध्या सोशल मिडिया आणि विविध माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या काही संशयास्पद माहितीमुळे
संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः भारतीय सशस्त्र दलांशी संबंधित,
तसेच राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेल्या घटनांबाबत अर्धवट किंवा शहानिशा न केलेली माहिती समाजमाध्यमांवर फिरताना दिसत आहे.
Related News
यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहून, कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती अधिकृत स्रोतांवरून तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
भारत सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कोणतीही माहिती ही केवळ
अधिकृत संकेतस्थळांवरून किंवा अधिकृत निवेदनांद्वारेच स्वीकारावी.
अफवांवर विश्वास ठेवल्याने सामाजिक तणाव, संभ्रम आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करताना जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर कोणी नागरिकांना सोशल मीडियावरून संशयास्पद माहिती प्राप्त झाली, विशेषतः
भारतीय सैन्य, सुरक्षा दल अथवा सध्याच्या संवेदनशील परिस्थितीबाबत, तर त्यांनी ती
माहिती त्वरित संबंधित यंत्रणेला कळवावी, जेणेकरून योग्य कारवाई करता येईल.
Read Also : https://ajinkyabharat.com/bullion-shop/
