मुंबई | 8 मे 2025 – भारताने 6-7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9
दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले.
या कारवाईनंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून त्याचा परिणाम थेट
Related News
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बिथरलेली कुरापत:
S-400 ‘सुदर्शन चक्र’ची किमया!
ऑपरेशन सिंदूरवर सीएम योगींची स्पष्ट भूमिका
सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंवर झाला आहे. भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांचा कल
सुरक्षित गुंतवणुकीकडे वळला असून, सोन्याच्या किमती पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठत आहेत.
गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या किमतीत तब्बल 5,000 रुपयांची वाढ झाली असून,
24 कॅरेट सोनं 100711 रुपये प्रति तोळा या पातळीवर पोहोचले आहे.
गुरुवारी सकाळीच याचे दर 101110 रुपये पर्यंत पोहोचले. 23, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दरही झपाट्याने वाढले असून,
याचा सर्वसामान्य ग्राहकांवर विशेषतः लग्नसराईत मोठा आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, बाजारातील जाणकारांचा अंदाज आहे की या वर्षाच्या शेवटी सोन्याचे दर
1.20 लाख रुपये प्रति तोळा पर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या चढत्या दरात मोठी खरेदी करू नये,
असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देत आहेत.
दरम्यान, जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय
बाजारात सोन्याच्या किमती स्थिर आहेत. मात्र, भारतातील भू-राजकीय घडामोडी आणि धार्मिक
सणांच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वधारले आहेत.
चांदीचे दरही यामध्ये मागे नाहीत. 999 शुद्धतेच्या चांदीचे दर 97587 रुपये असून,
जीएसटीसह चांदीचे दर 95045 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अशा स्थितीत ग्राहकांनी सध्या खरेदी टाळावी
आणि बाजार स्थिर होईपर्यंत प्रतीक्षा करावी, असे मत सराफा व्यवसायिक व्यक्त करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoorvar-jatik-patham/